फलटण प्रतिनिधी : संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर सोमवारी दुपारी तरडगावकडे प्रस्थान केले. खंडाळा - फलटण तालुक्याच्या सरहद्दीवर कापडगाव येथे सरदेच्या ओढ्यावर खास उभारलेल्या मंडपासमोर फलटण तालुक्याच्यावतीने माउलींचे स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी खंडाळा तालुक्याच्यावतीने माउली व सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यावेळी लोणंदचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, निंबोडीचे सरपंच बाळासाहेब शेळके-पाटील, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस तारिक बागवान व अन्य पदाधिकारी, लोणंद व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महानंदचे माजी व्हा. चेअरमन डी. के. पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण खताळ, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, कोरेगावचे सरपंच सुनील शिंदे, कापडगावच्या सरपंच अर्चना गेजगे, कुसूरचे माजी सरपंच दादासाहेब नरुटे, पराग भोईटे इनामदार, वैभव खताळ, शरद खताळ, मनोज चव्हाण, सुरेश चव्हाण, नंदकुमार खताळ, शैलेश भोईटे, संजय चव्हाण, सरपंच अजित भोईटे, मंजाबा खताळ, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग, फलटण उप अभियंता राजकुमार मठपती, शाखा अभियंता ए. टी. काळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, भक्त मंडळी उपस्थित होती.