ज्या वेळी निरा - देवघर सुरु होईल त्यावेळी बचतीचे पाणी फलटणला मिळाले नाही तर तो या तालुक्यावर अन्याय होईल. ज्या ठिकाणी या धरणाने जन्म घेतला त्याचे पाणी या तालुक्याला मिळालेच पाहिजे. तुम्ही नवीन पाण्याचा शोध घ्या दुसऱ्याच्या कष्टावर किती दिवस मुजोरपणा करणार. काम न करता हिमालया येवढया महत्वकांक्षा का ठेवता? पूर्वी निरा - भिमा स्थैरीकरणाला विरोध कोणी केला? आदी प्रश्न उपस्थित करून भ्रम निर्माण करून मते मिळवणाऱ्या भ्रमिष्ट माणसावर मी पुन्हा काही बोलणार नाही असे यावेळी आमदार रामराजे यांनी स्पष्ट केले
लोणंद - फलटण - बारामती रेल्वे मार्ग शरद पवार यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री जाफर शरीफ यांना लोकसभेत संसदीय कामकाजच्या वेळी देण्यात आलेल्या चिट्ठी मुळे या मार्गाच्या रेल्वेला मंजुरी मिळाली असल्याचे स्पष्ट मत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले, ते फलटण येथे पत्रकारांशी विविध विषयावर बोलत होते. लोकांच्या खिशात पैसा असेल तरच ते रेल्वेने प्रवास करू शकतात मग रेल्वे कशासाठी असे सांगतानाच आपणाला रेल्वे अडवायला वेळ लागला नसता असे यावेळी आ. रामराजे म्हणाले.
हिंदुराव नाईक निंबाळकर खासदार असताना त्यांनी केलेले संसदेतील भाषणाचा व्हिडीओ आपण पहिला असून त्या वेळेस रेल्वे मंत्री जाफर शरीफ असताना शरद पवारांनी सहज चिट्ठी द्वारे हा रेल्वे मार्ग बजेट मध्ये टाकण्याचा सल्ला दिला होता असे सांगून माझ्या दृष्टीने रेल्वेला प्राधान्य नव्हते असे यावेळी रामराजे यांनी सांगितले.
केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी केलेल्या निरा - देवघर प्रकल्पाच्या हवाई पाहणीतून त्यांना काय कळाले असा सवाल रामराजे यांनी उपस्थित केला.
निरा - देवघर धरण 11.85 टी. एम. सी. पाणीसाठा क्षमतेचे असून त्या काळी 66 किलोमीटर कालव्यांच्या निविदा काढल्या होत्या. असे निदर्शनात आणून देतानाच धोम बलकवडी मुळेच फलटण तालुक्यातील साखर कारखाने चालले आहेत. धोम बलकवडी धरण नसते तर फलटण तालुक्यातील कारखाने चालले असते का असा प्रश्न यावेळी आमदार रामराजे यांनी उपस्थित केला त्यामुळे फलटण तालुक्यात आलेले पाण्याच्या संपूर्ण श्रेय केवळ माझेच असून खासदारांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नयेत असे टीकास्त्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आमदार रामराजे यांनी सोडले.
धरण पुनर्वसनाची कामे आम्ही केली, धरणे आम्ही बांधली, मोर्चा काढून धरणे बांधता येत नाहीत पाण्यासाठी आम्ही कष्ट केले, आम्ही त्याग केला तर मग आपण कसले जननायक आपण तर खलनायक असा उल्लेख आमदार रामराजे यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता केला.
पक्षाच्या नावाने मते न मागता स्वतःच्या केलेल्या कामावर मते मागा असे आव्हान यावेळी रामराजे यांनी खा. रणजितसिंह यांना केले.
ज्या वेळी निरा - देवघर सुरु होईल त्यावेळी बचतीचे पाणी फलटणला मिळाले नाही तर तो या तालुक्यावर अन्याय होईल. ज्या ठिकाणी या धरणाने जन्म घेतला त्याचे पाणी या तालुक्याला मिळालेच पाहिजे. तुम्ही नवीन पाण्याचा शोध घ्या दुसऱ्याच्या कष्टावर किती दिवस मुजोरपणा करणार. काम न करता हिमालया येवढया महत्वकांक्षा का ठेवता? पूर्वी निरा - भिमा स्थैरीकरणाला विरोध कोणी केला? आदी प्रश्न उपस्थित करून भ्रम निर्माण करून मते मिळवणाऱ्या भ्रमिष्ट माणसावर मी पुन्हा काही बोलणार नाही असे यावेळी आमदार रामराजे यांनी स्पष्ट केले.