फलटण प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील बेरोजगारी सर्वसामान्य कुटुंबाला भेडसावणारी समस्या असल्याने या भागातील युवकांनी नोकरी शोधण्यात दिवस वाया घालवण्यापेक्षा छोटा मोठा उद्योग व्यवसाय करून आर्थिक प्राप्ती करावी व आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे काम करावे असे आवाहन करीत ग्रामीण युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय उद्योग केला पाहिजे असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी व्यक्त केले.
विडणी (ता. फलटण) येथे महादेव जगताप यांनी नव्याने उभारलेल्या वस्त्र उद्योगाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्रालयातील अव्वर सचिव धीरज अभंग, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, विडणी गावचे सरपंच सागर अभंग, डॉ. उत्तमराव शेंडे आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी सामुदायिक त्रिसरण पंचशील म्हणण्यात आली. त्यानंतर प्रा. आढाव यांच्या हस्ते उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले. महादेव जगताप यांच्यावतीने , उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक तानाजी जगताप, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, सचिन अभंग, सुहास निकाळजे, संदीप रणदिवे, संतोष जगताप, अजित निकाळजे, पत्रकार सतीश कर्वे, योगेश निकाळजे, सुबोध शिर्के, यांच्या सह माजी सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.