फलटण प्रतिनिधी - धोमबलकवडी प्रकल्पग्रस्त् उत्तम विष्णू मोरे यांना सन २००० साली पुनर्वसनांतर्गत मौजे जोरगांव (पुनर्वसन), कुरवली खु. ता. फलटण येथे जमिन मिळाली होती मात्र सदर मिळकतीचे मुळ मालक राजेंद्र रामु चोरमले यांनी सन २०१२ पासुन मोरे यांनी विनाकारण त्रास देऊन मिळकतीमध्ये जबरदस्तीने अतिक्रमण केले आहे. याप्रकरणी शासनाकडुन दखल घेण्यात येत नसल्याने अखेर उत्तम विष्णू मोरे यांनी आपल्या कुटुंबासह फलटण येथील उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी फलटण यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.
या निवेदनात पुढे असे म्ह्टले आहे की, सन २००० साली पुनर्वसनांतर्गत मौजे जोरगांव (पुनर्वसन), कुरवली खु. ता. फलटण येथील गट नं. २८६/२ मधील १ हे ६० आर जमिन कब्जेपट्टीप्रमाणे उत्तम मोरे यांना मिळाली आहे. परंतु सदर मिळकतीचे मुळ मालक राजेंद्र रामु चोरमले यांनी सन २०१२ पासुन मोरे यांना विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केली. सदर मिळकतीमध्ये जबरदस्तीने अतिक्रमण करुन वहिवाट घालणे, पिके घेणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, जमिन तुमची नाही माझी आहे तुम्ही शासनाकडुन जमिन घ्या जमिन माझी आहे तुम्ही वहिवाट घालु शकत नाही असा प्रकार करण्यात आला. तर सन २०१६ साली चोरमले यांनी संगनमताने दिशाबदली प्रस्ताव सादर केला व त्यानंतर सदर मिळकतीमध्ये कब्जा करुन कागदपत्रे आणा मग बघु असे अशा याप्रकारे मोरे यांना त्रास दिला असे निवेदनात म्हटले आहे.
उत्तम मोरे यांनी सर्व शासकिय कार्यालयांना याबाबत लेखी पत्रव्यवहार करुन अर्ज केले तरी शासनाकडुन दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी रजि. दस्तू नं. ७४४ अन्वये सदर मिळकतीमधील ० हे २० आर क्षेत्र चुकीच्या चतुः सिमा नमुद करुन शोभा दिपक झिटे व मयुर झिटे यांना विक्री केलेचा निवेदनात म्हटले आहे. सदर जमिन मिळकत माझे नावे असूनही शोभा दिपक झिटे व मयुर झिटे सदर जमिनीमध्ये अनधिकृतरित्या बांधकाम करत असल्याचे मोरे यांनी निवेदनात म्ह्टले आहे. सदर बांधकामामुळे माझे कधिही न भरुन येणारे नुकसान होणार असुन राजेंद्र चोरमले यांनी केलेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन सदर बांधकाम थांबविणेत यावे व या प्रकरणाची दखल घेवुन मला न्याय दयावा अन्यथा आपण बुधवार दिनांक २६ मार्च २०२५ रोजी सहकुटुंब आत्मदहण करणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.