फलटण प्रतिनीधी :-
महावितरणचे कार्यकारी अभियंता पासून शाखा अभियंता मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडून जात असल्याने फलटण महावितरण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महावितरण कर्मचा-यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहाणेबाबत व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडून न जाण्याबाबत महावितरण कंपनीने आजअखेर अनेक प्रशासकीय परिपत्रके काढूनही फलटण विभाग महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागीय कार्यालय तसेच चार उपविभाग व शाखा कार्यालय मधिल अभियंते व कर्मचारी त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी रहाणे बंधनकारक असताना मुख्यालयी राहत नसून मुख्य अभियंता आणि अधिक्षक अभियंता हे त्यांच्या अधिनस्थ कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा/तपासणी करताना कर्मचारी मुख्यालयात राहतात का याची तपासणी करत नसल्याने महावितरण कंपनीचे कर्मचारी बिनधास्त मुख्यालय सोडून इतरत्र राहत आहेत.
ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याकरीता व अचानकपणे उदभवणाऱ्या अडचणीचा निपटारा करण्याकरीता क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी रहाणे बंधनकारक आहे. याबाबत आढावा बैठकीमध्ये वेळोवळी सूचना देण्यात आल्या असताना याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही.महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणेबाबत आणि मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुध्द तसेच सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडून इतरत्र जाणाऱ्या विरोधात कारवाई करणेबाबत सुचना करण्यात आलेल्या आहेत.
क्षेत्रीय कार्यालयातील विभाग प्रमुखाकडून या प्रकरणी प्रभावीपणे आढावा घेतला जात नाही, तसेच दोषी कर्मचाऱ्यांवर तत्परतेन व गांभिर्याने कारवाई होत नाही.कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात रहाणेबाबत यापूर्वी दिलेल्या सूचनांची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, याकरीता मुख्य अभियंता आणि अधिक्षक अभियंता हे फलटण विभागीय कार्यालय अभियंता व कर्मचारी मुख्यालयात राहतात का? विना परवानगी मुख्यालय सोडून इतरत्र जातात का? याची तपासणी करत नाहीत. अधिक्षक अभियंता यांनी त्यांच्या मंडळातील सर्व कर्मचा-यांसंदर्भात अशा प्रकरणी तपासणी करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्याची आवश्यकता असून सदर पथकाने सुट्टीच्या दिवशी व कार्यालयीन वेळेनंतर विशिष्ट शाखा / उपविभागातील कर्मचाऱ्यांच्या घोषीत निवास स्थानांना भेट देऊन ते मुख्यालयात राहतात का? याची पडताळणी करावी व या संदर्भातील अहवालानुसार तात्काळ शिस्तभंगाविषयक कारवाई करण्यात यावी तसेच कसूरदार अधिका-यांविरूध्द शिस्तभंगाविषयक करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या मुख्यालयी न राहता रोज येणे-जाणे करतात. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या व निर्माण होणाऱ्या घटनेला /अडचणीला ते त्वरित सामोरे जाऊ शकत नाहीत त्यामुळे गोंधळ निर्माण होतो व जनक्षोभ वाढतो. तसेच बरेच अधिकारी/कर्मचारी कार्यालयात वेळेवर व सोमवारी तसेच शुक्रवारी उपस्थित रहात नसल्याचेही सतत नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. जे अधिकारी/कर्मचारी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नाहीत तसेच कार्यालयात वेळेत उपस्थित रहात नाहीत अशा अधिकारी/कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या सर्व प्रकाराचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. याप्रकरणी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.
एका शाखा अभियंता यांना नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी वीज समस्याबाबत फोन केला असता शाखा अभियंता सलग दोन ते तीन दिवस ग्रामीण भागात हजर नसल्याने तसेच राहण्यास नसल्याने तुम्ही मुख्यालयी का राहत नाही अशी विचारणा केली असता "तुला काय करायचे ते कर,कुणाकडे जायचे त्याच्याकडे जा" असे उत्तर दिले असल्याची माहिती एका शेतकऱ्याने दिली.