फलटण प्रतिनीधी:- मौजे पवारवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या व तिच्या आईच्या आत्महत्या प्रकरणी नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस तीन आरोपींना अटक करत नसल्याप्रकरणी पोलिसांच्या कामावर आक्षेप घेत उपोषणाचा इशारा दिला आहे.
अनिल शिवाजी गावडे व चंदुलाल बाबुराव धुमाळ यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत असे सागितले की, सुखदेव मिंड, त्यांची पत्नी राधा सुखदेव मिंड यांनी आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी ही अल्पवयीन असताना सुध्दा त्यांनी त्यांचा मुलगा गणेश सुखदेव मिंड यांनी तिला लग्नाचे अमिष दाखवून मुलीस फुस लावुन तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबध केले व तिच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला.
ही बाब लक्षात आल्यावर अल्पवयीन मुलीने व तिच्या आईने दोघींनी दिनांक २२ रोजी पवारवाडी गावच्या हद्दीत असलेल्या बहीणीच्या शेतातील विहरीमध्ये आत्महत्या केली आहे. या आत्महत्येस सुखदेव मिंड, राधा सुखदेव मिंड व गणेश सुखदेव मिंड हे जबाबदार असून गुन्हा दाखल झाल्यापासून दिनांक 22 पासून आजअखेर दिनांक 29 अखेर संबधित तिन्ही आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली नसून आय.पि.सी 376,363, 306,34 व पॉक्सो 4 व 17 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल होऊनही फलटण ग्रामीण पोलिसांनी तीनही आरोपींना अटक करावी याकरिता सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या बाहेर आत्महत्या करणाऱ्याच्या मुलीचे व आईचे नातेवाईक उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. अल्पवयीन मुलीच्या व तिच्या आईच्या आत्महत्या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिस आरोपींना अटक होत नसल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या कामावर आक्षेप घेतला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस याप्रकरणी लक्ष घालणार का असा सवाल पत्रकार परिषदेत नातेवाईकांनी केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस आता या प्रकरणात कोणती भूमिका घेणार असा सवाल नातेवाईकांनी विचारला आहे. फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणुन काम करित असताना धस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गून्हे काही तासात उघड झाले आहेत त्यामूळे धस आपल्या कुशलतेने आरोपींना अटक करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.