Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
प्रभाग २ मध्ये वैशाली अहिवळे भाजपा उमेदवारीच्या प्रबळ दावेदार शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम

बांबू लागवड अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा - नंदकुमार वर्मा

टीम : धैर्य टाईम्स

सातारा, दि.14  : जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत बांबू लागवड अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना मनरेगाचे मिशन महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बांबू लागवड अभियान मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी श्री. वर्मा यांनी या सूचना केल्या.

यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी विजय यादव, राजेंद्र शहा, संजीव कर्पे यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, वन व कृषि विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे सांगून श्री. वर्मा म्हणाले, बांबू पिकाचा समावेश आता गवत वर्गीय वनस्पतीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता बांबूची तोडणी ही करता येते व ते जाळताही येतात. तसेच नवीन धोरणानुसार आता औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये किमान 60 टक्के जैविक इंधनाचा वापर बंधनकारक करण्यात येत आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये बांबूची मागणी वाढणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. यंत्रणांनी शेतकऱ्यांना याचे फायदे समजावून सांगण्यासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

 श्री. वर्मा पुढे म्हणाले, पर्यावरणामध्ये कार्बनचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी जैविक इंधनाचा वापर ही काळाची गरज आहे. त्यासाठी जैविक इंधनाची उपलब्धताही तितकीच महत्वाची आहे. बांबू हे जैविक इंधन म्हणून महत्वाची वनस्पती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवून त्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच बांबूपासून मिळणारे उत्पन्न हे ऊसाच्या उत्पन्नाप्रमाणेच आहे. त्याला पाणीही कमी लागते. त्यामुळे पाण्याची बचत होण्यासही मदत होणार आहे. याशिवाय फक्त जाळण्यासाठी नाही तर बांबूचा वापर अगरबत्ती, फर्निचर या उद्योगांमध्येही होतो. हे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांनी एकत्र काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सुरुवातीला जिल्ह्यातील नदी काठच्या शेतांमध्ये बांबू लागवड करावी असे सांगून शेतकरी नेते श्री. पटेल म्हणाले, बांबूचे बेट तयार होते. त्याला तंतूमुळ असते त्यामुळे जमिनीची धूप थांबवण्यास त्याचा फयदा होतो. कोयना धरणाच्या बुडित क्षेत्राच्या बाजूने बांबूची लागवड केल्यास धरणामध्ये येणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी बांबू लागवड हा एक चांगला पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांना किमान 20 एकर बांबू लागवडीचे उद्दीष्ट देण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, बांबू लागवडीची जिल्ह्यात सुरुवात झाली असून येत्या वर्षभरात त्याविषयीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल. या उद्दीष्टीविषयी दर आठवड्याला आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी रोहयोच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती यादव यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात बांबू लागवडीविषयी सुरू असलेल्या कामांविषयी माहिती सादर करताना जिल्ह्याला 27 हजार 500 हेक्टर बांबू लागवडीचे उद्दीष्ट असून त्यामध्ये जिल्हा परिषद – 10 हजार, वन विभाग व सामाजिक वनीकरण – 10 हजार आणि कृषि विभागास 7 हजार 500 हेक्टर या प्रमाणे उद्दीष्ट असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात सध्या 16 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर काम सुरू असल्याची माहिती दिली.  

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER