फलटण प्रतिनीधी -
फलटण तालुक्यातील भाजप पदाधिकारी व बुथ अध्यक्ष, शक्ती शक्ती केंद्रप्रमुख यांची महत्त्वपूर्ण बैठक खास बेळगावहुन आलेले निरिक्षक मा. धनंजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला लीड मिळाले तेथे भाजप ला उमेदवारी घ्यावी अशी एकमुखी मागणी केली आहे.
यावेळी विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील , मंडल अध्यक्ष अमोल सस्ते ,मा.जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, नगरसेवक सचिन अहिवळे ,रियाज इनामदार , नितिन जगताप , महिला मोर्चा अध्यक्ष सौ ऊषा राऊत, अमिर शेख , राहुल शहा यावेळी उपस्थित होते यावेळी मंडल अध्यक्ष अमोल सस्ते यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मते मांडली यावेळी बोलताना सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी सविस्तर अहवाल निरीक्षक यांच्यासमोर मांडलेला आहे मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये १८००० हजार मताचं लीड या मतदारसंघातून असल्यामुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सोडून घ्यावा कारण या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मित्र पक्षापेक्षा जास्त वाढलेली आहे .या मतदारसंघांमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामामुळे व भारतीय जनता पक्षाने दिलेल्या मदतीमुळे या मतदारसंघाचा विकास झालेला आहे.
निरा देवधरच पाणी प्रश्न , फलटण बारामती रेल्वे ,धोम बलकवडी बारमाई , नाईकबोमवाडी एम.आय. डी. सी,रस्त्यासाठी कोठ्यावधीचा रुपयाचा निधी अनेक प्रकल्प या तालुक्यातील मार्गी लावल्यामुळे जनता भारतीय जनता पक्षाबरोबर राहील असा आत्मविश्वास यावेळी जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच फलटण तालुक्यातील जनताला परिवर्तन पाहिजे. ज्यांनी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांचा पराभव करून या तालुक्यातील जनतेचे नुकसान केले आहे.
त्यांना जनता घरी बसवले शिवाय राहणार नाही. या तालुक्याचे भुमि पुत्राला केंद्रात मंत्री पद मिळाला असतं तर या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला असता .त्यामुळे यावेळी कसल्याही परिस्थितीमध्ये फलटण तालुक्याचा आमदार बदलायचा असं जनतेने ठरवलेला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला लीड मिळाले तेथे भाजप ला उमेदवारी घ्यावी अशी एकमुखी मागणी केली आहे. यावेळी निरिक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले की देशपातळीच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाचे आहे परकीय शक्तींना रोखण्यासाठी व राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करावे परंतु फलटण तालुक्यातील सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर जर पक्षाचा या ठिकाणी नुकसान होणार असेल तर मी माझा अहवाल पक्षश्रेष्ठीकडे नक्की सादर करेल व हा मतदारसंघ सोडवुन घेण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन धनंजय जाधव यांनी दिले. यावेळी वसिम मणेर, सनी मोरे , राजेंद्र निंबाळकर, संजय गायकवाड, सुनील जाघव, शरद झेंडे, सुनील घोलप ,सनी कदम ,विजय कदम , प्रसाद पाटील, उमेश पवार, सरपंच गाढवे , सोपान जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.