महामार्गावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई करून वाहनधारकांना ऑनलाइन ई - चलन पाठविण्यात येते. मात्र बहुतांशी वाहनधारक ई - चलन मिळूनही दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. अशा वाहनांचा समावेश काळ्या यादीत केला जाणार असून वाहनधारकांनी महाट्रॅफिक ॲपद्वारे आपल्या वाहनावर ई - चलनाद्वारे दंड किंवा आपले वाहन काळ या यादीत टाकण्यात आलेले आहे का ? याची खात्री करणे गरजेचे आहे. वाहनधारकांनी आपल्या वाहनावर ई - चलनाद्वारे दंड आकारला गेला असल्यास सदरचा दंड वेळेत भरून आपले वाहन काळ्या यादीत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन भुईंज (जोशीविहीर) येथील महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी ' साहस वार्ता ' शी बोलताना केले.
ई - चलन सातारा,
महामार्गावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई करून वाहनधारकांना ऑनलाइन ई - चलन पाठविण्यात येते. मात्र बहुतांशी वाहनधारक
ई - चलन मिळूनही दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. अशा वाहनांचा समावेश काळ्या यादीत केला जाणार असून वाहनधारकांनी महाट्रॅफिक ॲपद्वारे आपल्या वाहनावर ई - चलनाद्वारे दंड किंवा आपले वाहन काळ या यादीत टाकण्यात आलेले आहे का ? याची खात्री करणे गरजेचे आहे. वाहनधारकांनी आपल्या वाहनावर ई - चलनाद्वारे दंड आकारला गेला असल्यास सदरचा दंड वेळेत भरून आपले वाहन काळ्या यादीत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन भुईंज (जोशीविहीर) येथील महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी ' साहस वार्ता ' शी बोलताना केले.
सपोनि गुरव पुढे म्हणाले, महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी ' स्पीडगन ' असलेली अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मोबाईल पोलिस व्हॅन महामार्गावर गस्त घालत असते. या मोबाईल व्हॅनद्वारे भरधाव वेगाने वाहन चालवणे, विना सीटबेल्ट वाहन चालविणे, विना इन्शुरन्स, विनापरवाना आणि वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर ई - चलनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते आणि सदरचे ई - चलन हे ऑनलाईन किंवा पोस्टद्वारे वाहनधारकाला पाठवले जाते. तसेच संबंधित वाहनधारकांच्या मोबाईलवर संदेश पाठविला जातो. मात्र बहुतांशी वाहनधारक माहिती मिळूनही सदरचा दंड भरत नसल्यामुळे दिवसेंदिवस वाहनधारकांच्या ई - चलनाद्वारे केलेल्या दंडाच्या रकमेत वाढ होत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र ज्या वाहनधारकांनी महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ई - चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करूनही सदरचे वाहनधारक दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करत असतील, अशा वाहनधारकांच्या वाहनांचा समावेश काळ्या यादीत केला जातो. आपल्या वाहनाचा समावेश का यादीत केला गेले असल्याची कल्पना संबंधित वाहनधारकांना नसते. याची माहिती मिळविण्यासाठी वाहनधारकांनी स्वतःच्या मोबाईलवर महाट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये गाडी नंबर व गाडीक्या चेसी नंबरचे शेवटचे चार अंक टाकल्यावर तुमच्या वाहनावरील कारवाईची व दंडाची माहिती प्राप्त होते. प्रत्येक वाहनधारकांनी याची वारंवार खातरजमा करणे गरजेचे असल्याचे सपोनि गुरव यांनी स्पष्ट केले.
भुईंज (जोशीविहीर) येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिसांनी महामार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, विना हेल्मेट, विना सीटबेल्ट वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, महामार्गावरील लेन कटिंग करणे, रेड सिग्नल क्रॉस करून जाणे, धोकादायक वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे, चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे आणि परवानगी नसताना प्रवाशांची वाहतूक करणे इत्यादी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत एकूण १०५४७ वाहनधारकांच्यावर केसेस करून ३४ लाख ५२ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे, तर जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० अखेर ८३७२२ केसेच्या माध्यमातून ६ कोटी २६ हजार ४० दंड वसूल करण्यात आलेला आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ५४७२३ वाहनधारकांच्या वर केसेस दाखल करून ८४ लाख ९१ हजार ६८९ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे. म्हणजे गेल्या तीन वर्षात महामार्ग पोलिसांच्या कडून महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १ लाख ४८ हजार ९९२ केसेसच्या माध्यमातून वाहनधारकांच्या कडून सुमारे सात कोटी ४४ लाख ५२ हजार ४२९ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
दंडाची रक्कम जमा करण्याचे आवाहन
ई - चलन प्राप्त झाल्यानंतर त्वरित दंडाची रक्कम भरणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधित वाहनांचा काळया यादीत समाविष्ट करण्यात येणार असून वाहनधारकांनी लवकरात लवकर दंडाची रक्कम जमा करण्याचे आवाहन भुईंज (जोशीविहीर) येथील महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी वाहनधारकांना केले आहे.
सपोनि दत्तात्रय गुरव
भुईंज महामार्ग पोलीस केंद्र
तीन वर्षात सुमारे साडेसात कोटी रुपयांचा दंड वसूल
गेल्या तीन वर्षात महामार्ग पोलिसांच्या कडून महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १ लाख ४८ हजार ९९२ केसेसच्या माध्यमातून वाहनधारकांच्या कडून सुमारे सात कोटी ४४ लाख ५२ हजार ४२९ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे











