पुरस्कार मिळाल्याने काम करण्यासाठी व्यक्तीला ताकत मिळते. त्यामुळे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी आपली कार्याची व्याप्ती वाढली असल्याचे समजून जोमाने कामाला लागावे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतुने सर्वांनी काम करावे, असे प्रतिपादन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी केले.
कराड : पुरस्कार मिळाल्याने काम करण्यासाठी व्यक्तीला ताकत मिळते. त्यामुळे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी आपली कार्याची व्याप्ती वाढली असल्याचे समजून जोमाने कामाला लागावे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतुने सर्वांनी काम करावे, असे प्रतिपादन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे परिवर्तन प्रतिष्ठान, कराड संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले आदर्श पुरस्कार 2021 चा वितरण सोहळा संपन्न झाला. संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, डॉ. विजय निलावर (हिंगोली), माया कांबळे (लातूर), दादासाहेब ननावरे (बीड), सचिन होळकर (नाशिक), हरिभाऊ थोरात (पुणे), हसन रिफाई (रत्नागिरी), सौ. हेमलता गायकवाड़, चंद्रकांत कांबळे (सातारा), ज्योती अदाटे (सांगली), वैष्णवी गुरव (कोल्हापुर) यांना राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले आदर्श पुरस्कार 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी दलित मित्र संघटनेचे राज्याध्यक्ष नरोत्तम चव्हाण, सांगली जिल्हा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष ज्योती अदाटे, प्रेसकौंसिल ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष दिलीप सवने, प्रा. कादर नायकवड़ी, नगरसेवक महेश कांबळे, माजी नगरसेवक आनंदराव लादे, मानव अधिकार संघटना सचिव प्रिया अलेकरी, काकासाहेब जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज, राजार्श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजन करून, तसेच सविधानाचे पूजन करून करण्यात आली. प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष समाजभूषण आप्पासाहेब गायकवाड यांनी केले. सचिव बुद्धभूषण गायकवाड़, सल्लागार राजेंद्र माने, शंकर वीर, सचिन कांबळे, सुजाता वरे, आनंद सवाखंडे आदींनी कार्यक्रमसाठी परिश्रम घेतले. निवेदन दीपक तड़ाखे यांनी केले. प्रमोद काशिद यांनी आभार मानले.