सातारा १ : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग ,वक्तृत्व व वादविवाद मंडळ व दैनिक सकाळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेंबर २०२३ रोजी कर्मवीर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बी.के.बिर्ला कॉलेज मुंबई येथील यश रवींद्र पाटील याने प्रभावी वक्तृत्व करीत प्रथम क्रमांकाचे रुपये पाच हजार ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र हे पारितोषिक मिळविले. तर याच स्पर्धेत द्वितीय , क्रमांकाचे रुपये तीन हजार व सन्मानचिन्ह हे पारितोषिक न्यू आर्टस ,कॉमर्स कॉलेज अहमदनगरचा विद्यार्थी महेश जनार्दन उशीर याने मिळवले. तर अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट वाठारचा विद्यार्थी गणेश ज्ञानदेव लोळगे याने रुपये दोन हजार ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र हे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. यावर्षी या स्पर्धेत दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आलेली होती. श्रुती अशोक बोरसे ,एच .पी.टी.कॉलेज नाशिक ,प्रज्ज्वल संजय नरवडे डी.ई.एस नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय पुणे ,अथर्व नंदकुमार खरे किसनवीर महाविद्यालय वाई,सुफिया इस्माईल नायकवडी ,व्ही.एन.एम .कॉलेज शिराळा,संतोष सर्जेराव शिंदे एस.पी.एन इंजिनियरिंग कॉलेज हडपसर , संकेत कृष्णात पाटील शिवराज कॉलेज गडहिंग्लज ,शिवम संजय माळकर भारती विद्यापीठ सांगली ,प्रियांका संजय कंठे ,इस्माईलसाहेब मुल्ला लॉं
कॉलेज सातारा,आकांक्षा सहदेव गुरव लॉं कॉलेज सातारा व मोहन साईराज घाटपांडे डी.ई.एस .नवलमल फिरोदिया कॉलेज पुणे या दहा विद्यार्थ्यांना रुपये पाचशे व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील विनायक साळुंखे, ध्रुव पटवर्धन आणि वरद गाडेकर यांनी आपली सांघिक कामगिरी
चांगली करत फिरता चषक जिंकण्याचा मान मिळविला. छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. परीक्षक म्हणून फलटण येथील मुधोजी कॉलेजचे मराठी विभागातील प्राध्यापक डॉ.अशोक शिंदे ,सुशीलाताई गाढवे महाविद्यालय खंडाळा येथील मराठी विषयाच्या प्राध्यापक डॉ.प्रतिभा पाटणे व महिला कॉलेज कराड येथील प्रा. डॉ.विलास सुर्वे यांनी काम पाहिले. समन्वयक म्हणून डॉ.कांचन नलावडे यांनी काम पाहिले.यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,डॉ.विद्या नावडकर,प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे ,प्रा.प्रियांका कुंभार व प्रा. श्रीकांत भोकरे , प्रा. पायल शेळके, प्रा. सोमनाथ कोळी, वेळ नियंत्रक प्रा.सोमनाथ कोळी व
प्रा.ऋषिकेश काळे इत्यादी प्राध्यापक , कमवा आणि शिका योजनेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हे उपस्थित होते. सकाळी झालेल्या वक्तृत्व स्पर्धा उद्घाटन सत्रात दैनिक सकाळ सातारा येथील सहयोगी संपादक मा. राजेश सोळस्कार यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. त्यांनी मराठी विभागाशी करार करून सकाळ कॉलेज विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी त्यांना व्यासपीठ निर्माण करून देत असल्याचे सांगितले तर विद्यार्थ्यांनी सखोल वाचन करून ज्ञान आत्मसात करून वक्तृत्वाच्या आधारे समाजहिताचे काम करावे असे आवाहन केले. कृतीशील पत्रकारिता ही समाज घडवीत असते.सकाळने यीन,एन.आय.ई.किंवा इंटरनशनल सर्विस सेंटर स्थापन करून समाजाच्या हितासाठी आपली बांधिलकी कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले .प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी सकाळ च्या सहयोगाने समाजात मोठी कामे झाल्याचे सांगत सकाळच्या सर्वच संपादकांच्या कार्याबद्दल कौतूक केले. तसेच मा.आर.आर.पाटील यांनी अभ्यास करून प्रभावी वक्तृत्वाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद मिळविल्याचे सांगितले. वक्तृत्व कलेचा विधायक उपयोग करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. या स्पर्धेसाठी,कोपरगाव ,संभाजीनगर,पुणे,मुंबई,कोल्हापूर,सावंतवाडी,अहमदनगर, नाशिक, इत्यादी जिल्ह्यातून ४६ स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेसाठी सूत्रसंचालन समीक्षा चव्हाण व सिद्धिका भोसले यांनी केले. प्रास्ताविक डॉ.कांचन नलवडे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे यांनी मानले
.कु. जान्हवी चव्हाण ,वर्षा जाधव ,सायली माने ,अनुजा पोरे,विक्रम खरात, ऋत्विक शेलार,अजिंक्य जाधव, ओमकार खंडझोडे इत्यादींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.