थील कृष्णा कॅनॉल-गोवारे रस्त्याचे दोन वर्षापूर्वी झालेली अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच कॅनॉलची पडझड झाल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. याप्रश्नी बळीराजाच्या वतीने ना. बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले होते.
कराड : येथील कृष्णा कॅनॉल-गोवारे रस्त्याचे दोन वर्षापूर्वी झालेली अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच कॅनॉलची पडझड झाल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. याप्रश्नी बळीराजाच्या वतीने ना. बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार ना. कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सदर रस्त्यासाठी १ कोटी १४ लाखाचा निधी मंजूर करून दिला असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दोन वर्षापूर्वी झालेली अतिवृष्टीमध्ये कृष्णा कॅनॉल-गोवारे रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच कॅनॉलची पडझड झाल्याने रस्ताही वाहतुकीस धोकादायक बनला होता. याबाबत संघटनेच्या वतीने ना. ना. बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार ना. कडू यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. त्यामुळे कृष्णा कॅनॉललगत संरक्षण भिंत बांधण्यासाठी सुमारे १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाची लवकरच सुरुवात होणार आहे.
यासाठी मा टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडीचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार साहेब, उपविभागीय अधिकारी कृष्णा कालवा उपविभाग कराडचे रणदिवे साहेब यांनीही चांगल्या पध्दतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. ना. बच्चू कडून यांनी याप्रश्नी विशेष लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावल्याने गोवारे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
तसेच ना. बच्चू कडू यांनी कृष्णा कॅनॉल-गोवारे हनुमाननगर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सदर प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.