अंतरवली सराटी : मनोज जरांगे - पाटील यांची तब्बेत अतिशय खालवली आहे. आपण भेटून विचारपूस केली. गेली चार दिवस झालं त्यांनी अन्नपाणी काहीच घेतलेलं नाही.सरकार ही लक्ष देत नाही. जरांगेचा रोहीत वे्मुला पॅटर्न फडणवीस यांनी करू नये, तात्काळ राज्य सरकारने दखल घ्यावी अशा प्रकारे ट्विट करत मनोज जरांगे - पाटील यांना भेटल्याचे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी म्हटले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून त्यांनी माहिती दिली आहे.
पुढे अपल्या ट्विट मध्ये दिपक केदार म्हणतात, मी जरांगे यांना पाणी पिण्याचा आग्रह केला पण त्यांनी ते नाकारलं. आपण टिकले पाहिजेत, आपल्याला खूप व्यापक लढाई लढायची आहे. आम्ही सोबत आहोत, एकटं समजू नये त्यावेळी जरांगे यांनी प्रतिसाद दिला पण ते एकदम हालले आहेत अशी चिंता यावेळी केदार यांनी व्यक्त केली आहे.
सरकार जरांगे यांच्या कडे लक्ष देत नाही. जरांगेचा रोहीत वे्मुला पॅटर्न फडणवीस यांनी करू नये. तात्काळ राज्य सरकारने दखल घ्यावी व चर्चा करायला यावं व मनोज जरांगे यांचा जीव वाचवावा अशा अशायाचे ट्विट करीत केदार यांनी केले आहे.