फलटण प्रतिनिधी - विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी 5 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती. पहिल्या दिवशी आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची तब्बल 17 तास चौकशी केली. तर दुसऱ्या दिवशीही फलटण येथे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आयकर विभागाची चौकशी केली होती. आज तिसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा सकाळी लवकरच सुरु झालेली आयकर विभागाची चौकशीची बॅटिंग रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. तर या चौकशीमुळे फलटण शहासराह तालुक्यात उलट - सुलट चर्चाना उधाण आले आहे.
या चौकशीमुळे सोशल मीडियावरही राजे समर्थक यांच्याकडून या चौकशीचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर लोकसभा निवडणूकीत महायुती विरोधात काम केल्यामळे राजेंची राजेंची चौकशी सुरु झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.
दरम्यान आजही तिसऱ्या दिवशीही संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील बंगल्यासमोर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये विविध गावचे पुढारी, आजी - माजी पदाधिकारी सकाळपासूनच ठाण मांडून होते.
दरम्यान सायंकाळी साडेचारच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी संजीवराजे नाईक निंबाळकर यांना घेऊन त्यांच्या गोविंद मिल्क या ठिकाणी चौकशीसाठी नेहल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. दरम्यान गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीचे कामकाज सुरळीत सुरू होते.
पुणे येथील लक्ष्मी या निवासस्थानाची चौकशी तब्बल 50 तासानंतर संपली -
दरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे येथील लक्ष्मी या निवासस्थानी सुरु असलेली आयकर विभागाची चौकशी तब्बल 50 तासानंतर संपली आहे.कोणत्याही प्रकारचा संशयित व्यवहार आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीला नाईक निंबाळकर कुटुंबियांनी पूर्णपणे सहकार्य केले आहे. पुण्यातील चौकशी संपली असली तरीही फलटण येथील चौकशी मात्र अजूनही सुरूच आहे.
सगळ्या पुढाऱ्यांना एकाच तागड्यात तोलू शकत नाही - रघुनाथराजे नाईक निंबाळकर
त्यांनी काही जरी चेक केलं तरी काही वेड - वाकडं असेल तर सापडेल वेड - वाकडं नसेल तर सापडूच शकत नाही अशी प्रतिक्रिया आज रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. आणि त्यांना जी अनैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या इस्टेटीची अपेक्षा असती ती सापडू शकत नाही. महाराष्ट्रात काही तरी घरे असतील जेपहिल्यापासून चांगली असतील, असं नसतं
सगळ्या पुढाऱ्यांना एकाच तागड्यात तोलू शकत नाही असेही यावेळी रघुनाथराजे म्हणाले. अधिकारी फार चांगले आहेत प्रत्येक कागद बघतात आम्हाला कसलीही तकलिफ नाही असेही ते म्हणाले. चौकशी अजून दोन दिवस चालेल अशी माहितीही रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आज सकाळी दिली. कागदपत्राची व्यवहाराची चौकशी सुरु असून राजकीयदृष्ट्या ही चौकशी आहे का या प्रश्नाला उत्तर देताना असे काही नाही असे शेवटी रघुनाथराजे म्हणाले.