फलटण प्रतिनिधी - मे महिन्यातील अवकाळी पावसाने हाहाकार माजावला होता. या अतिवृष्टीने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बाणगंगा नदी व तालुक्यातील ओढ्याना आलेल्या पुराणे मोठे नुकसान झाले होते. भविष्यात अशी नैसर्गिक आपत्ती तालुक्यात ओढाऊ नये, याकरिता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बाणगंगा नदी व ओढे स्वच्छ करण्याचे महत्वाचे काम हाती घेत नदीचे रुपडे पालटले. त्यामुळे बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष म्हणून म्हणून रणजितदादा असल्याचे गौ्रोदगार माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी काढले.
फलटण तालुक्यातील अतिवृष्टी झाले नंतर मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने निरा उजवा कालवा अधीक्षक अभियंता यांचे कडून 6 फोकलेन मशीन घेऊन फलटण तालुक्यातील बाणगंगा नदी व ओढे साफ करण्याचे काम हाती घेतले व त्यांचे प्रयत्नातून बाणगंगा नदी पहिल्यांदा स्वच्छ होऊन नदीचे रुपडे पालटले आहे. भविष्यात अतिवृष्टी झाली तरी नदी काठाला असलेल्या फलटण मधील घरा मध्ये पाणी जाऊ नये यासाठी जे प्रयत्न रणजितसिंह यांनी केले त्या बद्दल त्यांना मलठण व फलटण मधील नदी काठावरील शनीनगर, शुक्रवार पेठ, भैरोबा गल्ली, बुधवार पेठ, मंगळवार पेठ येथील नागरिकांनी विशेष धन्यवाद दिले असल्याचे शेवटी अशोकराव जाधव यांनी म्हटले आहे.