धैर्य टाईम्स - विशेष
अनेक वर्षांची प्रतीक्षा अनेक महिन्यांचा संघर्ष आणि अखेर प्रशासनाला कंटाळलो आहे आता सुट्टी नाही अशा आशयाचा सोशल मीडिया वर मेसेज देऊन साखरवडीत तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा केला. साखरवडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक व्हावे यासाठी बौद्ध बांधव गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून प्रतीक्षेत आहेत. अनेक वेळा आंदोलन, मोर्चा काढूनही शासनाकडून दखल घेतली जात नव्हती. अखेर आज भगवान बुद्ध यांची मूर्ती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा केला आहे.
यावेळी साखरवाडी येथील भीम अनुयायांसह तालुक्यातील बौद्ध बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. याविषयी आता शासनाची भूमिका काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
साखरवाडी येथे सर्व भीमसैनिकांनी या असे आवाहनही आता साखरवाडी येथून होत आहे.