जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने आघाडी धर्म सोयीस्कर पणे पाळला मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिल्हा पातळीवर स्वबळावर च लढणार आहे. येथील स्थानिक समीकरणे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहेत. राष्ट्रवादीने जर येथे आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सातारा : जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने आघाडी धर्म सोयीस्कर पणे पाळला मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिल्हा पातळीवर स्वबळावर च लढणार आहे. येथील स्थानिक समीकरणे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहेत. राष्ट्रवादीने जर येथे आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष नुकतीच पूर्ण झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने जनहिताचे जे निर्णय घेतले ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे. या अनुषंगाने आयोजित बैठकीनंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार महेश शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते नितीन बानुगडे, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शहर संघटक प्रणव सावंत इ यावेळी उपस्थित होते.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षाच्या वाटचालीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने दोन वर्ष पूर्ण केली. या सरकारने अनेक निर्णय जनहिताचे निर्णय घेतले. करोनाच्या काळात गेल्या दोन वर्षात राज्यशासनाला तब्बल एक लाख कोटी रुपयांचा फटका बसला तरीसुद्धा शासनाने सरकारी कर्मचार्यांच्या पगारावर परिणाम होऊ दिला नाही. तब्बल बावीस हजार कोटीची कर्जमाफी, पोलीस कर्मचार्यांना दीडपट अनुज्ञेय महागाई भत्ता, करोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचार्यांना पन्नास लाखांची भरपाई, नागपूर येथे डीएनए परीक्षण प्रयोगशाळा, जिल्हा नियोजन समिती च्या निधीत तीस टक्के वाढ डीपीसी च्या माध्यमातून करोना निर्मूलनासाठी साडेचार हजार कोटीचा खर्च, आमदार निधीची दोन कोटीवरून चार कोटी पर्यंत वाढविलेली मर्यादा, अतिवृष्टी व आपत्तीग्रस्तांना तब्बल 11%52 कोटीची मदत, आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी तब्बल पाच हजार कोटीच्या निधीची उभारणी, पोलिसांच्या फोर्स वनसाठी अत्याधुनिक शस्त्र खरेदी तर राज्यात 529% पोलीस कर्मचार्यांची भरती शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे सुमारे सत्तर टक्के झालेले काम इ महत्वाचे निर्णय घेतले सातारा जिल्ह्यात जंबो हॉस्पिटल व सीसीसीची उभारणी हे निर्णय महत्वपूर्ण होते. राज्यशासनाकडून गेल्या दोन वर्षात जास्तीत जास्त निधी सातार्या साठी उपलब्ध करून देण्यात आला. आत्तापर्यंत कोविड निर्मूलनासाठी 112.5 कोटी रुपये खर्च झाला. कोविडमुळे दोन्ही पालक गमाविलेल्या 14 बालकांना पाच लाखाची मदत तर शेतकर्यांना 3% 0 कोटीची कर्जमाफी देण्यात आली. सातारा जिल्ह्यात पहिला डोस 85%नागरिकांनी तर दुसरा डेस 3%% नागरिकांनी घेतला आहे. गेल्या दोन वर्षात जे जनहिताचे निर्णय झाले त्याची माहिती जन सामान्यांपर्यंत पोहचविण्याची मोहिम शिवसेनेने हाती घेतली असून त्यांच्या सूचना जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसैनिकांना देण्यात आल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
जगभरात दहशतीचे वातावरण तयार केलेल्या ओमी क्रोम विषाणूच्या सतर्कतेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना शंभूराज म्हणाले राज्यातील विमानतळ प्राधिकरणां ना विशेषत्वाने सतर्क करण्यात आले असून आरटीपीसीआर टेस्ट विलगीकरण आणि चाचणी संख्या इ सूचना देण्यात आल्या आहेत. टास्क फोर्स यंत्रणा सतर्क असून प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. सातारा जिल्ह्यातही नागरिकांनी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजना या संदर्भाने जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व सर्व यंत्रणांची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समन्वयाने तातडीची बैठक घेतली जाणार असून साथनियंत्रणाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी धर्म पाळला जाणार का ? या प्रश्नांवर शिवसेनेने शंभर टक्के आघाडी धर्म पाळला आहे. मात्र राष्ट्रवादी कडूनच या आघाडीचे सोयीस्करपणे पाळणे झाले मात्र जे राजकारण झाले त्याची कल्पना आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊन येथील स्थानिक समीकरणे काय आहेत हे सुद्धा निदर्शनास आणले आहेत. याच संदर्भाने कोरेगाव मतदारसंघात आघाडी धर्म असणार का ? या प्रश्नाला आमदार महेश शिंदे यांनी स्पष्टपणे खोडून काढले. कोरेगावात आघाडी धर्माचा दुरान्वये संबंध असणार नाही, कोरेगावमध्ये जिल्हा बँकेवर निवडून आलेले उमेदवार हे शिवसेनेचे आहेत. कोरेगाव व माणं येथील संचालक शिवसेनेचे असून राष्ट्रवादीने नाकारले तरी सेनेने आपली ताकत दाखविली आहे. जर राष्ट्रवादीने जर राजकीय समीकरणांमध्ये आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हाला सुद्धा सगळे पर्याय खुले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा शिवसेना पूर्ण ताकतीने स्वबळावरच लढणार. शिंदे शिंदे भावकीच्या संदर्भाचा प्रश्नही महेश शिंदे नाकारत म्हणाले कुठं आमच्याशी भावकी जोडताय ते जावलीचे आम्ही खटावचे त्यांचा आमचा काही संबंध नाही, गावात एखादा फिरस्ता येऊन राहतो मग अनेक वर्ष उलटल्यावर ते गाव मग त्यांचचं आहे अस काहीजणांना वाटायला लागतं, कोरेगावात काहींच असचं झालंय, अशी राजकीय कोपरखळी मारायला महेश शिंदे विसरले नाहीत.
महाविकास आघाडी ने गेल्या दोन वर्षात सामान्यांना पिळवटायचे काम केले असा आरोप भाजप नेत्यांनी केला होताए या प्रश्नांवर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, भाजपच्या नेत्यांची ही बडबड वैफल्यग्रस्ततेतून सुरु झाली आहे. सरकार पाडायचे स्वप्न ते गेल्या दोन वर्षा पासून बघत आहेत मात्र त्यांना यश येत नाही. त्यांच्या या अर्थहीन बडबडीकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचे विकासाचे काम अखंड सुरु असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.











