फलटण प्रतिनिधी :
मौजे मुंजवडी, ता. फलटण, जि. सातारा येथील अवैध उत्खननाची चौकशी होणेबाबत मा. तहसिलदार फलटण यांचेकडे दि. ८/५/२०२३ रोजी केलेल्या अर्जावर दिनांक ९/५/२०२३ रोजी केलेल्या चुकीच्या व बेकायदेशीर पंचनामा केला असल्याची तक्रार करण्यात आली असून मुंजवडी येथील तलाठी खाडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी, मौजे मुंजवडी, ता. फलटण, जि. सातारा येथील गट नं. ७४१ मधील क्षेत्र ० हे. ८४ आर आकार २ रु. १९ पैसे हिस्सा ० हे. २१ आर ही जमीन असुन सदरील क्षेत्राचे शेजारील गट नं. ७३८ चे मालक गणपत तुकाराम रणदिवे व त्यांची मुले राहुल गणपत रणदिवे व संभाजी गणपत रणदिवे व पत्नी मालन गणपत रणदिवे यांनी गट नं. ७३८ मध्ये त्यांनी जे.सी.बी.च्या सहाय्याने त्याचा रजिस्टर एम. एच. ४५ ए.क्यु. २१५२ च्या सहाय्याने एम. ४२ बी ९३२६ व एम.एच.४२ बी ९३२७ ही वाहने वापरुन गट नं. ७३८ मधील ३ ते ४ फूट मातीचे मा. तहसीलदार साो. यांची परवानगी न घेता बेकायदेशीर वरील सर्व लोकांनी संगनमत करुन मातीचे उत्खनन केलेले आहे. त्या संबंधित लेखी अर्ज दिनांक ८/५/२०२३ रोजी मा. तहसिलदार सो. फलटण यांचेकडे दिलेला होता. तद्नंतर दिनांक ९/५/२०२३ रोजी गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी पंचनामा करण्याचा आदेश मा. तहसिलदार साो. फलटण यांनी दिलेला होता. सदरील अवैध उत्खननाचा पंचनामा करतेवेळी कोणत्याही पंचास न बोलविता व समक्ष हजर न राहता गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी वर नमुद राहुल रणदिवे, गणपत रणदिवे, संभाजी रणदिवे, मालन रणदिवे यांचे सांगणेप्रमाणे गट नं. ७३८ मध्ये गेलो असता सदर गटामध्ये आजरोजी गणपत तुकाराम रणदिवे यांचा त्यांच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये ऊस हे पीक असुन अंदाजे १० ते ११ महिन्याचे दिसून आले असून त्याची ऊंची अंदाजे ७ ते ८ फूट असल्याचे दिसून येत आहे व सदर गटामध्ये आज रोजी माती, मुरुम इत्यादी कोणत्याही प्रकारचे उत्खनन आल्याचे दिसून येत नाही असा खोटा व लबाडीचा मजकुराचा राजकीय दबावाखाली पंचनामा केलेला आहे.
तो चुकीचा व लबाडीचा मजकुराचा असुन गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी सरकारी कामात कसुर केलेले आहे. त्यामुळे गावकामगार तलाठी मुंजवडी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सदरील पंचनाम्यावर गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी १) दत्तात्रय दगडु साळुंखे रा. मुंजवडी, ता.फलटण, जि.सातारा १) जहांगीर तय्यब शेख, रा. मुंजवडी, ता.फलटण, जि.सातारा ३) बाजीराव तुकाराम रणदिवे या पंचाचे सहया हया पंचनामा करतेवेळी किंबहुना घटनात्मक पंचनाम्याचे ठिकाणी घेतलेल्या नाहीत. त्यांना गट नं. ७३८ च्या घटनात्मक पंचनाम्याचे अनुषंगाने सहया घेत असल्याचे बाब न सांगता केवळ गावकामगार तलाठी मुंजवडी यांचे सांगण्यावरुन न वाचता किंबहूना न वाचून दाखविला सदरील पंचाच्या सहया घेतल्या आहेत. प्रत्यक्षात सदरील गणपत रणदिवे, राहुल रणदिवे, संभाजी रणदिवे यांनी अवैदयपणे विनापरवाना मातीचे उत्खनन करुन वाहतुक करुन गट नं. ७४१ चे फार मोठे नुकसान केलेले आहे. सदरील गट नं. ७३८ च्या उत्खननामुळे गट नं. ७४१ मधील पाणी वाहून जाणार आहे. तसेच सदरील गट नं. ७३८ मधील गणपत रणदिवे यांनी अवैद्य उत्खनन केल्याचे बाब गावकामगार तलाठी यांनी हेतू पंचनाम्यामध्ये केलेले नाही. याउपरही सॅटेलाईटव्दारे गट नं. ७३८ मध्ये अवैदय उत्खनन झाल्याचे स्पष्टरित्या दिसून येणार आहे. त्यामुळे गावकामगार तलाठी मुंजवडी यांनी दिनांक ९/५/२०२३ रोजी केलेल्या पंचनामा खोटा लबाडीचा असुन केवळ राजकीय दबावापोटी खोटया स्वरुपाचा तयार करुन पंचासमक्ष केलेला नाही. त्यामुळे सदरील गावकामगार तलाठी मुंजवडी यांचेविरुध्द योग्य ते कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
तसेच ज्या लोकांच्या पंचनामा करतेवेळी हजर असलेबाबत सही घेतलेली आहे परंतु ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर नसतानाही त्यांच्या सहया घेतलेल्या आहे. त्यांनी तसे नोटरीत करुन आम्ही त्या ठिकाणी हजर नव्हतो असे लिहून देखील दिलेले आहे.