फलटण प्रतिनिधी:- जिंती येथे जुन्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास मौजे जिंती गावाच्या हद्दीत जिंती ते खुंटे रोडवर असणारे सार्वजनिक शौचालय जवळ बाळू भीमराव रणवरे, शोभा बाळू रणवरे, शरद भिमराव रणवरे, बबल्या शरद रणवरे, विशाल रमेश रणवरे, मुकुंद आण्णासो रणवरे, दत्तात्रय भिमराव रणवरे, अशोक श्रीहरी रणवरे (सर्व रा.जिंती तालुका फलटण) या सर्व आरोपी यांनी दिनांक १४ रोजी सायंकाळी जितोबा मंदिराचे जवळ झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी रवींद्र उर्फ पप्पू दिनकर वाघमारे (रा. जिंती ता. फलटण जि. सातारा) यास लोखंडी सतुर, लोखंडी कुऱ्हाड , लाकडी काठी, हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी यांचे दोन्ही हाताला दोन्ही पायाचे नडगीला तसेच पाठीवर व फिर्यादीचा मुलगा राजवीर याचे उजव्या हाताला जखम झाली आहे. फिर्यादी हे गुन्हा घडले पासून उपचार घेत असल्याने व त्यांची तब्येत बरी झाल्याने उशिरा तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी आठ जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार यादव करत आहेत.