२५५ फलटण - कोरेगांव हा २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या राखीव विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौध्द समाजातील घटकाला गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याची समाजात खंत निर्माण झाल्याने व आपणास डावलले जात असल्याची भावना निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर २०२४ च्या होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत बौध्द समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी अवघ्या फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील बौध्दांनी " एकच निर्धार ...बौद्ध आमदार ' अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले आहे होते. या संवाद अभियानास फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर बौद्ध समाजातील बांधवांची राजकीय मोठ बांधण्यासाठी फलटण येथे बौद्ध समाजाच्या महामेळाचे आयोजन रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण याठिकाणी केले होते.
खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना भेटून बौद्ध समाजाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळावे याकरिता निवेदन देत मागणी केली होती. मात्र वरील पैकी कोणत्याही नेत्याने बौद्ध समाजाच्या मागणीचा सकारात्मक निर्णय घेतला नाही. वास्तविक या नेत्यांच्या पक्षांमध्ये बौद्ध समाजाचे अनेक प्रतिनिधी कार्यरत आहेत. मात्र उमेदवारी करीता सकारात्मक निर्णय झाला नसून इतर समाजातील उमेदवार जाहिर केले आहेत.
बौद्ध समाजाच्या मागणीचा कोणताही विचार राजकीय पक्षाने केला नसल्याने समाज आता आक्रमक झाला आहे. खा. शरद पवार यांच्या पक्षात आ. दिपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर आज प्रवेश करणारअसून जाहिर सभा होत आहे. तर मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीही आज फलटण येथेच सभा होत आहे. या राजकीय सभांवर बौद्ध समाजाने बहिष्कार घातला असून या सभांना बौद्ध समाजातील कोणीही जाऊ नये असे सोशल मीडियावर संदेश झळकू लागले आहेत.जर या सभांला समाजातील कोणी दिसला तर " गद्दार " टॅग लावला जाईल असेही म्हटले आहे.