केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत नाही; तोपर्यत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
कराड : केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत नाही; तोपर्यत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
राज्यमंत्री बच्चू कडू सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असता सोमवारी २९ रोजी येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील प्रहार जनशक्तीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह अपंग, विकलांगांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित बानगुडे, कराड तालुकाध्यक्ष सतीश पाटील, विद्याताई करंडे, रुपेश राठोड, अशोक काळोखे, रंजना बर्गे आदी. उपस्थित होते.
ना. बच्चू कडू म्हणाले, गेल्या दीड-दोन वर्षात कोरोनामुळे झालेल्या उपद्रवाचा राज्य सरकारवर परिणाम झाला आहे. परंतु, या काळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने गाडगेबाबांच्या ददशसुत्रीप्रमाणे उत्कृष्ठ काम केले आहे. तसेच भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव न वाढल्यास सरकारचे काम आणखी उठून दिसेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, कोरोना काळात राज्यातील अपंग, विकलांग, शेतमजुरांच्या भेटी घेता आल्या नाहीत. परंतु, यापुढे जास्त जोमाने काम करणार असून दोन महिन्यात विविध ठिकाणी अपंग, विकलांग, शेतमजुर बांधवांसाठी १ दिवसाचा जनता दरबार भरवून त्यांची कामे मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ना. बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदाधिकार्यांना संघटनेची नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच काही अपंग, विकलांगांना व्हीलचेअर, गरजेचे साहित्यही देण्यात आले.
हार-तुऱ्यांपेक्षा गरजूंना मदत करा
प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी हार, शाल, श्रीफळ, बुके आणले होते. यावेळी ना. बच्चू कडू यांनी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना माझ्या स्वागतासाठी हे सगळे करण्याची आजीबात गरज नसून शाल, सत्कारापेक्षा या पैशांमधून गरजूंना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. तसेच याप्रसंगी एका कुटुंबाला धान्य कीट देत स्वतःच्या खिशात हात घालून त्यांनी आर्थिक मदतही केली.
अपंगांचे काम करण्यामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद
पाटण तालुक्यातील पूरग्रस्त व भूस्खलनग्रस्त लोकांसह अपंग, विकलांग, गरजूंना मदत केल्याची दखल घेत ना. बच्चू कडू यांनी पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे यांचा सत्कार केला. तसेच गावागावात जाऊन अपंगांना मदत करण्यामध्ये आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद मिळत असल्याचे सांगून त्यांनी तहसीलदार टोम्पे त्यांच्या कामचे कौतुक केले.