केंद्रीय निवडणूक आयोगकडून आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची आज घोषणा केली.
महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक?
महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा करताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे. फडणवीसांनी त्यांच्या ट्विटरवर "शंखनाद...." असे लिहीत आपली प्रतिक्रीया दिली आहे.