फलटण प्रतिनिधी : फलटण येथील लोकमान्य पतसंस्था कर्जदार व ठेवीदार यांच्या मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. यावेळी कायदेतज्ञ, विधीतज्ञ, माजी सहकार विभागातील अधिकारी, विविध सामाजिक संघटना पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर कर्जदार व ठेवीदारांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.मेळाव्यासाठी सर्व कर्जदार व ठेवीदारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
फलटण येथील लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांचे मुदत पूर्ण झाल्यानंतरही आणि काहींची मुदत पूर्व मागणी असतानाही ठेवीच्या रकमा परत केल्या नाहीत याप्रकरणी पोलीस ठाण्यात संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी तसेच जिल्हा ग्राहक न्यायमंचाकडे फिर्याद दाखल करण्याची मागणी होत आहे.
लोकमान्य पतसंस्था ठेव गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली असून पतसंस्थेच्या कर्ज वसुली व ठेवी वाटप मध्ये अफरातफर व अनियमितता झाल्याची तक्रार काही कर्जदार व ठेवीदार यांनी केली आहे. त्यामुळे संचालक, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. आर्थिक गुन्हे विभागातर्फे तपासणी करण्याची मागणी होत आहे. कर्जदार व ठेवीदारांचे जवाब नोंदविण्यात यावेत. शासनाकडून लेखा परिक्षण तपासणी करण्याची आवश्यकता असून क्षमतेपेक्षा जास्त कर्ज वाटप केल्यामुळे व कर्जाची वसुली झालेली नसल्यामुळे संस्था अडचणीत आली आहे असा सर्वसाधारण सूर आहे.
थकीत कर्जदार यांच्याकडून बेकायदेशीर व नियमबाह्यपद्धतीने कर्ज वसुली सुरू असून ठेवीदार ज्येष्ठता यादीनुसार कर्ज वसुली नुसार ठेव वाटप होत नसून लोकमान्य संस्था बेकायदेशीर कर्ज वसुली व ठेव वाटप प्रकरणी जबाबदार व्यक्तींचे विरोधात गुन्हे दाखल करण्याची आपल्या आवश्यकता असल्याचे कर्जदार व ठेवीदार यांनी सांगितले आहे. अनेक थकीत कर्ज वसुली या बेकायदेशीर तडजोडी झाल्या असल्याचा आरोप होत आहे याबाबत सहकार आयुक्त यांनी चौकशी करावी. आजअखेर किती थकीत कर्ज वसुली झाली त्याचे वाटप ठेवीदार यांनी नियमाप्रमाणे झाले का असा सवाल विचारला जात आहे.
नियमबाह्य कर्ज वसुली व वसुली झालेल्या रकमेतून नियमबाह्य ठेवी वाटप होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. आजअखेर गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे वेळोवेळी आश्वासन दिले होते. आजअखेर ठेवीदारांनी त्यांना भरपूर अवधी संस्थेस दिला आहे. परंतु त्या काळात गुंतवणूकदारांचे पैसे पतसंस्था परत करू शकली नाही. एकंदरितच या सर्व पार्श्वभूमीवर आता गुंतवणूकदारांना आपल्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवावयाची आहे. कर्जदार व ठेवीदार यांनी एकत्रित एका मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. मेळाव्यास अनेक कायदे तज्ञ, विधीतज्ञ, माजी सहकार विभागातील अधिकारी, विविध सामाजिक संघटना पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात काय होईल याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.