फलटण प्रतिनिधी :-
आळंदी - पंढरपूर पालखी महामार्गाचे काम करणाऱ्या आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या नियमबाह्य व धोकेदायक कामामुळे दोन तरुणांना जीव गमवावा लागला असून याप्रकरणी आर के सी कंपनीच्या विरोधात गुरुवारी फलटणकरांनी मोर्चा काढला व अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केलेचे प्रकरण ताजे असतानाच फलटणच्या उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी वर्गाने आज शुक्रवार दिनांक १९ मे रोजी दुपारच्या सत्रात एका कार्यक्रमास कंपनीच्या गाडीने गेल्याने फलटणच्या अधिकरी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराच्या गाडीचा आसरा असल्याची चर्चा रंगली होती.
केवळ चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताच्या दुःखद घटनेमुळे अजूनही फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असताना तसेच अत्यंत गरीब असणाऱ्या मृत्य तरुणांच्या कुटुंबियांना अद्यापही कोणतीही मदत आर. के. सी. कंपनी कडून दिली गेली नाही. समस्त फलटणकर आर. के. सी. कंपनी व महसून विभागावर प्रचंड नाराज असताना याच नाराजी बाबत काल काढण्यात आलेल्या मोर्चा मध्ये निवेदना द्वारे संबंधित आर. के. सी. कंपनी व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या वर कारवाई ची मागणी केली असताना आज आखेर कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मृत्य तरुणांच्या कुटुंबियांना दिली गेली नाही.
याच पार्श्वभूमीवर आर्थिक मदत मिळणे बाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे दुपारच्या जेवणाच्या वेळेत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यातील बहुसंख्य कर्मचारी कंपनीच्या गाडी व कर्मचारी समवेत एका आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास गेले होते. फलटण तालुक्यात एक गंभीर अपघाता होऊन चार दिवस उलटले नसताना कंपनी कर्मचारी व शासकीय कर्मचारी अशा प्रकारे कंपनीच्या गाडीने फिरत असल्याने अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या घटनेचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येते. संबंधित अधिकारी व कर्मचारी कंपनीची गाडी वापरत असल्याने नक्की कंपनीचा व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संबंध काय असा सवाल निर्माण होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १९ रोजी दुपारच्या सत्रात कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडी मधून दुपारी एक ते दिड वाजण्याच्या दरम्यान कंपनीच्या कर्मचाऱ्यां सोबत उपविभागीय कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी यामध्ये कार्यालयात काम करणारे खाजगी कर्मचारीही कंपनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी कंपनीच्या गाडीने सातारा रस्ताने नांदल मार्गे एका अज्ञात ठिकाणी गेले.
संबंधित कार्यक्रम उरकून त्याच पांढऱ्या रंगाच्या गाडीत पुन्हा साडेतीन ते चारच्या दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मागे उतरून सर्व कर्मचारी आपापल्या कामाच्या ठिकाणी बसले व सदरची गाडी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सोडून निघून गेली. सदर या कार्यक्रमास कोण कोण कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते तसेच संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालय सोडण्यापूर्वी पूर्व परवानगी घेतली होती का? शासकीय कर्मचारी ठेकेदाराच्या गाडीने कसे काय फिरत होते? याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी चौकशी करून या बाबत जबाबदार अधिकरी यांना निलंबित करण्याची मागणी होत आहे.