फलटण दिनांक २३ ( प्रतिनिधी ) प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी पालखी तळाची (विमानतळ) स्वच्छता मोहिम जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ (विमानतळ) येथील स्वच्छता आणि साठलेला कचरा उचलण्याची विशेष मोहिम शुक्रवार, दि. २३ जून रोजी सकाळी ८वा.पासून सुरु करण्यात आली फलटणकर नागरिक, स्वयंसेवी आणि सहकारी संस्था, शिक्षण संस्था यामध्ये सहभागी झाल्या .
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येथून पुढे गेल्यानंतर पालखी तळासह (विमानतळ) व परिसराची स्वच्छता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षीप्रमाणे करण्यात येत असून यावर्षीही ती परंपरा अखंडित सुरु ठेवण्यात आली आहे.
या मोहिमेत शहर व तालुक्यातील शिक्षण संस्था मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था मधील आजी/माजी सदस्य, अधिकारी, कर्मचारी, यांनी योगदान दिले. पहिल्या टप्प्यात विमानतळ आणि परिसराची स्वच्छता करण्यात येत असून दुसर्या टप्प्यात अन्य भाग करणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले आहे.