फलटण | धैर्य टाईम्स |
सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास फलटण येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत निंबाळकर, सुशांत निंबाळकर, जेष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव, डॉ. सुभाष गुळवे, नितीन जगताप अमीरभाई शेख, घाडगे आदी उपस्थित होते.