चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं, "चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे." हा लढा मानवी हक्कासाठी होता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी झाला होता. त्यानंतर अनेक वर्षं हा दिवस 'समता दिन' तसंच 'सामाजिक सबलीकरण दिन' म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून पिंपरद (फलटण ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांना पुन्हा उजाळा देत नवीन पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर 20 मार्च 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व उपस्थितांना लिंबू सरबत वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, पिंपरद (फलटण ) या संस्थेचे जेष्ठ सल्लागार व विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सातारा सर्कलचे अध्यक्ष शरद मोरे, संस्थेचे अध्यक्ष नीरज मोरे, उपाध्यक्ष विकास मोरे, सचिव विक्रांत मोरे, यांच्यासह विनोद गायकवाड, अमित खुडे, प्रसन मोरे, समीर मोरे, विजय बनसोडे, राहूल मोरे, संतोष मोहिते, हनुमंत मोरे, बापू मोरे, इंद्रजीत मोरे, अभिजीत मोरे, कुमार मोरे, तानाजी जाधव, शिवा पवार, गजानन पवार, श्रीरंग मोरे, गोविंद मोरे, रवींद्र पालखे, संजय बनसोडे, साजन कांबळे, सर्वेद मोरे, राजदीप मोरे, शुभम बनसोडे, ऋषिकेश बनसोडे, सुहान मोरे, आदी उपस्थित होते.