Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एक दिलाने काम करुया -पालकमंत्री शंभूराज देसाई

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 15- महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये, उभारणीमध्ये, प्रतिष्ठेमध्ये सातारा जिल्ह्याने आणि सातारा जिल्ह्याने दिलेल्या नेतृत्वाने, वेळोवेळी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी फार महत्वपूर्ण योगदान दिले आहे,   आज सातारा जिल्हा प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठत राज्यातील मोजक्या जिल्ह्यांमध्ये पुढे आहे.  याचा मला अभिमान आहे. जिल्ह्याला सर्वांगीण विकासामध्ये अग्रभागी ठेवण्यासाठी पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील सर्व सहकारी मंत्री, सर्व खासदार व आमदारांच्या सहकार्याने व प्रशासनातील सहकारी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे, याला सर्वांचे सहकार्य राहो, असे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोण समारंभ संपन्न झाला.  यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा शल्यचिकीत्सक युवराज करपे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, व त्यांचे परिवारजन यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा वासियांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  या जिल्ह्याला थोर स्वातंत्रसेनानीची, सैन्यदलातील थोर वीर सुपूत्रांची खूप मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी वेळप्रसंगी कारावास भोगून, भूमीगत राहून, प्राणांची आहूती देवून योगदान दिले.  सातारा जिल्ह्याची राजकीय परंपरा सुद्धा खूप मोठी आहे अगदी महाराष्ट्र, गुजरात एकत्र मुंबई राज्य असताना सुद्धा या जिल्ह्याचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याचे नेतृत्व केले. 

 

सातारा जिल्ह्यामध्ये राज्यातले त्या काळातले 2000 मेगावॅट वीज निर्माण करणारे आणि 105 टीएमसी क्षमता असणारे सगळ्यात मोठे धरण आपल्या जिल्ह्यात आहे.  ज्यावेळी पुनर्वसनाचा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू नव्हता त्यावेळी स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या एका शब्दाखातर पाटण जावळी, व महाबळेश्वर या तीन तालुक्यातील 98 गावांचे पुनर्वसन करण्यात आले याचा आवर्जून उल्लेख करताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, 2019 पासून धरणग्रस्तांच्या पूनर्वसनाचे प्रश्न सोडविण्याचा सातत्याने आपणही प्रयत्न करीत आहे.

 

जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करत असताना करण्यात येत असलेल्या अनेक उपक्रम योजनांचा उल्लेख करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जागतिक वारसा स्थळांमध्ये ज्या 12 गडकोट किल्यांचा समावेश करण्यास युनेस्कोने मान्यता दिली आहे त्यातील 11 किल्ले आपल्या महाराष्ट्रातले आहेत.  त्यातला प्रतापगड हा आपल्या सातारा जिल्ह्यातला किल्ला आहे.  यूनेस्कोच्या यादीत समाविष्ट होण्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीमधून प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपये आपण मंजूर केले होते. पर्यटन विभागाकडून शिवप्रताप दिनाचे महत्त्व असलेल्या व अफजल वध झालेल्या ठिकाणी विव्हींग गॅलरी मंजूर केली आहे.  त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा कसा होता व त्याचे महत्व हे चित्ररूपाने समजावे म्हणून पर्यटन विभागामार्फत संपूर्ण इतिहास दाखवण्याचे काम त्या ठिकाणी करणार आहोत.

 

सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर येण्यासाठी याच वर्षाच्या मे महिन्यामध्ये महापर्यटन महोत्सव महाबळेश्वर येथे आयोजन करुन सातारा जिल्ह्याचे ब्रँडींग करण्याचे काम करण्यात आले.  सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड व पाटण तालुक्यामधील डोंगरी भागातील कला, युवक, महिलां  व कलाकारांमधील विविध गुण राज्यस्तरावर पोहोचविण्या साठी यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय डोंगरी महोत्सवाचे आयोजन पाटण तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे.  कोयनानगर येथील नेहरु उद्यानाचा जागतिक दर्जाच्या उद्यानाप्रमाणे विकास करण्यासाठी 75 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याला मंजूरी घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येणार आहे.  

 

जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी  गेल्या वर्षी वार्षिक नियोजन आराखडा 671 कोटी रुपयांचा होता.   या वर्षी  जिल्ह्याचा वार्षिक नियोजन आराखडा 744 कोटींपर्यत वाढविला आहे असे सांगून जिल्ह्याला आपण जवळपास 100 कोटीरुपयांचा अधिकचा निधी आणू शकलो याबद्दल पालकमंत्री श्री. देसाई यांनी समाधान व्यक्त केले.  

 

स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे परिवार, शहीद जवानांचे परिवार,  सैन्य दलातले निवृत्त अधिकारी,  उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचारी, नागरिक यांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान व विविध पुरस्कारांचे वितरण

        ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हवलदार अनिल दिनकर कळसे, रेठरे खुर्द ता. कराड यांच्या वीर पत्नी सुनिता दिनकर कळसे यांना, शहीद काँस्टेबल सूर्वे नवनाथ, घरातघर (गांजे) ता. जावळी यांच्या वीरपत्नी श्रीमती शालन नवनाथ सुर्वे, शहीद काँस्टेबल पवार अमर शामराव, बावडा, ता. खंडाळा, यांच्या वीर पत्नी कोमल अमर पवार, वीरमाता श्रीमती सुरेखा शामराव पावर तसेच वीरपिता शामराव महादेव पवार यांना सेवारत शिपाई इंगवले सागर हणमंत, चिंचणेर निंब ता. सातारा यांना दुखापत झाल्यामुळे 90 टक्के अपंगत्व आले त्यांच्या पत्नी श्रीमती निशा इंगवले, सेवारत नायब सुभेदार पिसाळ संतोष तानाजी, फडतरवाडी, ता. सातारा हे कर्तव्य पार पाडत असताना दुखापत झाल्यामुळे 30 टक्के अपंगत्व आले त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता संतोष पिसाळ यांना पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते ताम्रपट देऊन सन्मानीत करण्यात आले.  तसेच जमीन वाटपाचे दस्तऐवज वाटप करण्यात आले.  सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडून वीर नारी शेतकरी उत्पादक कंपनीला जलसंचय आणि बागायती लागवड समर्थनासाठी 11 लाख 95 हजार रुपयांचा धनोदश देऊन सन्मानीत करण्यात आले. बाळासाहेब भालचीम यांना राष्ट्रपती पदक घोषीत झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.  100 दिवस कार्यालयीन सुधारणांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय, सातारा या कार्यालयांचा पालकमंत्री यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबराबर अवयव दात्यांना प्रमाणपत्र व जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा, व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा पुरस्काराचे, जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कारही पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी केले.

 

तत्पूर्वी पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यानंतर शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER