केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये, असे मत मांडले आहे. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला व दारू पिणाऱ्याला आपण तुरुंगात टाकत नाही, त्याप्रमाणेच ड्रग्ज घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे, अशा पध्दतीचे विधान केंद्रीय मंञी रामदास आठवले यांनी केले.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये, असे मत मांडले आहे. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला व दारू पिणाऱ्याला आपण तुरुंगात टाकत नाही, त्याप्रमाणेच ड्रग्ज घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे, अशा पध्दतीचे विधान केंद्रीय मंञी रामदास आठवले यांनी केले.
दोंडाईचा वरवाडे नगर परिषद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पणसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी लोकार्पण सोहळ्यादरम्यान आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अंमली पदार्थांसदर्भातील कायदा बदलण्याचा विचार सुरु असल्याबद्दल भाष्य केले.
“आमच्या मंत्रालयाचे म्हणणे आहे की, दारु पिणाऱ्याला, सिगारेट पिणाऱ्याला, बिडी पिणाऱ्याला आपण तुरुंगात टाकत नाही. तसे ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगामध्ये न टाकता नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी नशामुक्ती केंद्र उपयुक्त आहे. म्हणून सध्या जो कायदा आहे ज्यात ड्रग्ज घेतलेल्याला तुरुंगात टाकल जाते. त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा विचार आमचे मंत्रालय करत आहे. लवकरच त्यासंबंधीचा कायदा जर झाला तर ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात न पाठवात नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात येईल,” असे आठवले यांनी म्हटले आहे.
ड्रग्ज पार्टी प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या व्यक्तिगत आरोपांचा देखील रामदास आठवले यांनी समाचार घेतला. यावेळी आठवले यांनी मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्जसंदर्भात आरोप करावेत परंतु समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करू नये, असे म्हटले. तसेच नवाब मलिक हे सामील असलेले सरकार हे ड्रग्जला पाठिंबा देणारे सरकार आहे. समीर वानखेडेंना, एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोपदेखील यावेळी आठवले यांनी केला आहे.
मला वाटते, समीर वानखेडे हे दलित आहेत. त्यांनी ड्रग्जमुक्त मुंबईची मोहीम हाती घेतलीय. त्याचसंदर्भात त्यांनी कारवाई केलीय. यात त्यांचा कोणताही व्यक्तिगत फायदा नाहीये. जे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत त्यातून समीर वानखेडेंना, एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुराव्यांच्या आधारे क्रुझवर छापा टाकून १९ जणांना अटक केली. २२ दिवस जामीन मिळाला नाही म्हणजे एनसीबीकडे मोठे पुरावे होते, असा याचा अर्थ आहे,” असे आठवले म्हणाले.