फलटण प्रतिनिधी:- श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू झाला असून काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील पालखी मार्ग व विसावा स्थळांसाठी अनेक मंत्री महोदय व जिल्हाधिकारी यांचे एका पाठोपाठ एक दौरे केले मात्र पुणे पंढरपूर हा पालखी महामार्ग सोडून कोणत्याही अधिकाऱ्याने शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गास भेट दिली नसून मलटण येथील जिंती नाका ते पाचबत्ती चौक या रस्त्याची आजूनही दुरुस्ती झालेली नसल्याने फलटण नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शहरातील मलटण येथून पालखी सद्गुरु पथ स्वामी समर्थ चौक उंबरेश्वर चौक पुढे महादेव मंदिर हरिबुवा मंदिर ,बाणगंगा नदी पाचबत्ती चौक ते विमानतळ असा फलटण शहरातील अंतर्गत पालखी मार्ग असून फलटण शहरात सध्या भुयारी गटर योजना व इतर कामांमुळे हा पालखी मार्ग अतिशय खराब झालेला आहे या रस्त्यावरून पायी चालत जाणे सुद्धा मुश्किल आहे दुचाकी चारचाकी वाहनांचे रोजच छोटे मोठे अपघात होत असतात अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावरील खड्यात पडून गंभीर दुखापत ग्रस्त झाले आहे वास्तविक फलटण मध्ये येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावरून प्रचंड वाहतूक असते तरी देखील गेली वर्षेभर नागरिक याच खड्डेमय रस्त्यातून ये जा करीत आहेत.
पालिकेवर सध्या प्रशासक म्हणून मुख्याधिकारी संजय गायकवाड जबाबदारीने काम पहात आहेत शहरातील इतर रस्ते डांबरीकरण करून दुरुस्त केले असताना श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची इतकी वाताहत झालेली असताना मुख्याधिकारी यांनी एकदाही या रस्त्याची पहाणी केलेली नाही किंवा दुरुस्ती ही केलेली नाही. मंत्री महोदय व जिल्हाधिकारी यांचे दौरे फक्त मुख्य महामार्गानेच होतात त्या मुळे या महत्वाच्या रस्त्यासाठी कोणी सूचनाही केलेल्या दिसत नाहीत. एकंदरीतच पालखी महामार्गाची अत्यंत वाईट अशी स्थिती असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
मागिल काही दिवसापूर्वी झालेल्या पावसात वाहने चालवताना कधी कधी फूटभर खड्यात तर कधी त्या पेक्षाही मोठ्या खड्यात आणि असंख्य छोट्या खड्यात वाहने घालावी लागतात गेल्या वर्षी दुरुस्ती च्या नावाखाली फक्त मुरूम भरला गेला वारकरी यांचेही खूप हाल झाले मागची चूक यावर्षीही करणार का असे नागरिक प्रश्न विचारत आहेत. जिंती नाका ते पाचबत्ती चौक हा मार्ग त्वरित दुरुस्त करावा व आगामी पालखी सोहळा व्यवस्थित पार पाडला जावा अशी नागरिकांनी विनंती केली आहे हे खड्डे फक्त मुरुमाने न भरता खडी व डांबरीकरण करून दुरुस्त करावेत अशी मागणी फलटणकर नागरिकांनी केली आ