फलटण प्रतिनिधी :
बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे. परंतु फलटणची खासदारकी गेली, तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले. सासवड ता. फलटण येथील धोम बलकवडी मायनर 37 व 33 च्या उदघाटन मा. खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व जेष्ठ नेते मा प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे पार पडले यावेळी झालेल्या कार्यक्रमात रणजितसिंह नाईक-निंबाळकर बोलत होते . यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, धनंजय साळुंखे पाटील,संत कृपा डेअरी चे प्रमुख विलासराव नलवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर,शहराध्यक्ष अमोल सस्ते,माजी नगरसेवक व शहरप्रमुख अनुप शहा ,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष जयवंत केंजळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे,मा.लतीफभाई तांबोळी, श्री शंभूराजे बोबडे, यांच्यासह हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना मा. खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की , बारामतीचे पाणी फलटण ला आणल्या मुळेच माझी खासदारकी गेली पण फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याचे सांगितले. 30 वर्षात मा रामराजेंनी फलटण चे पाणी बारामतीला विकले, लाल दिव्यासाठी फलटणच्या जनतेला बारामतीत गहाण ठेवले त्यांनी मा देवेंद्र फडणवीस व खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये असे स्पष्ट केले. ज्या आमदाराला मतदारसंघाला निधी किती आला हे माहित नसणे हे तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल आणि असल्या नंदी बैलांला घरी पाठवण्याची वेळ आता आली आहे आणि येत्या विधानसभेत फलटण ची सुज्ञ जनता ते काम चोख करेल यात शंका वाटत नाही.
माजी नगरसेवक अनुप शाह यांनी कॉन्टॅक्ट च्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार, विकास सोसायटी मधून शेतकऱ्यांना सभासद होण्यासाठी दिला जाणारा त्रास,पाण्याच्या कोटींच्या वर खर्च केलेल्या योजना तरीही गावात राज्यातील पहिला पाण्याचा टँकर सासवड मध्ये, ग्रामपंचायत मध्ये घोटाळे, डोंबाळवाडी योजना घोटाळा असा भ्रष्टाचाराचा पाढाच समोर ठेऊन यांना येत्या निवडणुकीत धडा शिकवलाच पाहिजे असे मत व्यक्त केले.
जेष्ठ नेते प्रल्हाद तात्या पाटील यांनी श्री रामराजे यांनी लोकसभेला युती धर्म पाळला नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपा देखील त्यांना निवडणुकीत हरवण्यासाठीच काम करेल असे ठासून सांगितले. जे पक्षाचे झाले नाहीत ते युतीचे काय होतील ? असा सवाल करुन केलेल्या कामाचे श्रेय घ्यावे पण ज्या कामात काहीही हातभार नसताना आयत्या पिठावर रेघोट्या रामराजेंनी ओढू नये अशा स्पष्ट भाषेत प्रल्हादराव पाटील यांनी समाचार घेतला.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष धनंजय पवार व किसान मोर्चा तालुकाध्यक्ष जयवंत केंजळे यांच्या मार्गदर्शनात अमोल चंद्रकांत झणझणे यांची किसान मोर्चा फलटण तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
आखिल भारतीय संत नामदेव महाराज संस्थेच्या वतीने संत नामदेव महाराज यांच्या स्मारकासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे ची जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सहकारी यांनी त्यांचा जाहीर सत्कार करून पूर्ण शिंपी समाज व संत नामदेव भक्तांच्या वतीने आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र काकडे यांनी केले व आभार किरण जाधव यांनी मानले.