विश्लेषण विशेष : ग्रामपंचायत पिंपरद
एकंदरीत फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे माजी चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व गेली तीस वर्षाहून अधिक काळ असल्याचे मतदारांनी मत पेटीतून दाखवणे दिले आहे.
या तीस वर्षांमध्ये नवीन पिढी मतदार म्हणून आली असताना त्यांनीही या राजे कुटुंबातील तिन्ही बंधूना आपले नेतृत्व मानीत त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. याला कारणेही तशीच आहेत. नवीन पिढी नव्या विचाराचे येत असते त्याच प्रमाणे राजे कुटुंब यांनी आपल्या आचार विचार व कार्यामध्ये स्वतःला अपडेट करत नव्या पिढिशी व नव्या विचारांची जुळवून घेतले आहे हे जाणीवपूर्वक निदर्शनात येते.
पिंपरद गावचे माजी पोलीस पाटील कै. सयाजीराव शिंदे -पाटिल यांनी कायम राजे गटाशी प्रामाणिक राहत राजकारण व समाजकारण केले. यश अपयशातून आपले राजकीय कारकीर्द चालू ठेवणारे कै. सयाजीराव शिंदे - पाटिल म्हणजे फलटण पूर्व भागातील राजे गटाचे कुशल व दमदार नेतृत्वच म्हणावे लागेल. दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूनंतर पिंपरद गावचे नेतृत्व हरवले.
सिंहाच्या बछड्याला शिकार करायला शिकवावे लागत नाही त्याचप्रमाणे कै. सयाजीराव पाटिल यांचे चिरंजीव व राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व किरणभैय्या सयाजीराव शिंदे - पाटिल यांनी अतिशय कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रात पदार्पण करत आपले कुशल नेतृत्व बुद्धी चातुर्य दाखवत जेष्ठ नेत्यांनाही चकित केले आहे.
गतपंचवार्षिक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सरपंच पदाच्या थेट निवडीत खासदार गटाचे कै. विजयराव घनवट यांनी विजय प्राप्त केला होता. मात्र अतिशय संयम व डावखुरा स्वभाव असणारे किरणभैय्या शांत राहतील कसे.
दुर्दैवाने कै. विजयराव घनवट यांच्या निधनानंतर किरणभैय्या यांनी आपली राजकीय मुसद्देगिरी दाखवत खासदार गटाची सत्ता राष्ट्रवादी कडे खेचली व खऱ्या अर्थाने गटनेते म्हणून किरणभैय्या नावाच्या नव्या युवा नेतृत्वाचा उदय झाला.
ग्रामपंचायत निवडणूक सन 2022 म्हणजे काल झालेल्या निवडणूकित खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले व स्थानिक दिग्गज नेत्यांना असमान दाखवत ग्रामपंचायत सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवली. पिंपरद ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 11 पैकी 6 ग्रामपंचायत सदस्य तर थेट सरपंचपदाचा ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे.
आ. रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या आचार व विचारांवर निष्ठा ठेवत किरणभैय्या हे राजकारणात नवी समीकरणे तयार करतीय या शंका नाही.