Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव वर्षांत हेच आमच्या वाट्याला आलं..... या प्रकाश पर्वाचा उजेड आमच्या झोपडीत कधी येईल?

टीम : धैर्य टाईम्स

सत्ता, संपत्ती, आणि प्रतिष्ठेच्या या बेगडी दुनिये मध्ये माणूस आणि माणुसकीचा अंत होत असताना काही बोटावर मोजण्यासारखे अपवाद वगळले तर गावकुसाबाहेर वाड्यावस्त्यांच्या बाहेर वंचित,शोषित, उपेक्षित समाजाचे दुःख घेऊन जगणाऱ्या या बारा बलुतेदार व अठरा आलूतेदारांमधील काही जातींची स्थिती फारशी सुधारलेली दिसत नाही._ 

        सामान्यपणे पाटील, कुलकर्णी हे सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने 'बारा बलुतेदार'म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्यांच्यावाचून शेतकऱ्‍यांचे नडत नाही, पण जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक गरजा भागवितात ते अलुतेदार. अलुतेदार हा अठरा जातींचा समूह आहे. यांचे महाराष्ट्रातील प्रमाण ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्ग (ओबीसी)मध्ये मोडतो. अलुतेदारांनाच ’नारू’ म्हणतात. कासार, कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भट,भोई,माळी,जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर,साळी या अठरा गाव कामगारांचा समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.

            गावगाड्यातील याच वंचित शोषित उपेक्षित समाजातील काही जात समूहांच्या जीवनात आजही अंधकार पसरलेला आहे. हेच मरीआईचे व लक्ष्मी आईचे पोतराज मरीआईचा गाडा घेऊन गावोगावी गुबू गुबू वाजवत अंगावर आसूडाचे (कोरड्याचा) फटके घेत देवीची उपासना करताना दिसतात. ते लोक गावोगावी आपल्या उदरनिर्वासाठी देवीच्या नावाखाली भीक मागण्याचे काम आजही करत आहेत. पूर्वी लोकांची दानत होती. लोक आपल्या दारात आलेल्या प्रत्येकाला सढळ हाताने मदत करायचे. आज मदत करणाऱ्या हातांना रोजगार नाही. शेत जमिनीचे तुकडे झाले. एकत्र कुटुंब पद्धती चे रूपांतर विभक्त कुटुंब पद्धतीत झाले. त्यामुळे प्रत्येक जण मी आणि माझे कुटुंब या पुरता सीमित झाला. या वंचित, शोषित, उपेक्षित समाजाच्या कुटुंबातील एखाद दुसऱ्या कुटुंबातील एखादा शिक्षित माणूस फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन हे अंधश्रद्धेचे जोखड फेकून आज तो स्थिरावला आहे. परंतु आजही गाव गावात नगरांमध्ये हे समूह मरीआईचा गाडा घेऊन दारोदारी आसूडाचे (कोरड्याचे) फटके घेत भिक मागताना दिसत आहेत. मी माझ्या वाढ वडिलांच्या काळात ही लक्ष्मी आईला पोतराज सोडल्याच्या गोष्टी ऐकल्या आहेत. माझे थोरले चुलते दिनकर घोरपडे हेही पोतराज म्हणून त्यांनाही देवीला सोडले होते.

         75 वर्षाच्या स्वातंत्र्याचा ढोल वाजवून अमृत बसून साजरा करत असताना आजही या या उपेक्षित, शोषित समाजातील बलुतेदार व अलुतेदार समाजातील काही जातसमुहांच्या वाट्याला हेच जगणे आले आहे. एका बाजूला ग्लोबलायझेशनची भाषा बोलणारे आपण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारे आपण त्यांच्यासाठी काय करू शकू याचा विचार कायम मनाला सतावतो. भ्रष्ट सत्तापीपासू राजकारण्यांकडून अपेक्षा करणे हे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे. त्यांना या समूहांना या दुःख, दैन्य व दारिद्र्यातून बाहेर काढण्याची मनापासून इच्छा नाही. आज हेच समूह उच्च शिक्षण घेतील. संघटित होतील आणि संघर्ष करायला लागले तर आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल याची त्यांना खात्री आहे. म्हणूनच या समूहांना ते जगूनही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत. आज संपूर्ण देशभर दिव्यांचा प्रकाश उजळलेला असताना, हे पर्व प्रकाशाचे पर्व आहे हे सुरू असताना हे वंचित, शोषित, उपेक्षित समाजातील घटक, ही माणसं आजही दारोदार भीक मागताना आपल्याला दिसत आहे. गेल्या 75 वर्षात हेच का आपण त्यांना दिलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर या समूहाच्या सामाजिक समतेसाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी खूप प्रयत्न केले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा! हा मूलमंत्र दिला. परंतु याचा खरा अर्थ या समूहांना आजही कळलेला दिसत नाही. त्यामुळे या लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत फारसा बदल झालेला दिसत नाही. पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यासारख्या भटक्या-विमुक्तांच्या न्यायी हक्कांसाठी लढणाऱ्या योद्धांमुळे काही प्रमाणात यात बदल होऊन आज ही कुटुंबे सन्मानाचे जीवन जगायला लागली आहेत. येणाऱ्या तरुण पिढीने याच लोकांसाठी काम करण्याची गरज आहे. फटाक्यांची आतिषबाजी, दारी रांगोळी, फराळाचं स्वादिष्ट आहार, दिव्यांची व पणत्यांची संपूर्ण आरास, नवीन कपडे, सुगंधी उठणे यात मश्गुल असणाऱ्या समाजाला या प्रस्थापित व्यवस्थेतील सत्ताधाऱ्यांना या माणसांचं दुःख खरच समजेल. हे लोक दोन पावलं उचलून या लोकांच्याकडे मदतीचा हात देतील. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून गेल्या 75 वर्षात आपण काय मिळवलं? एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या लोकांच्या झोपड्यामध्ये प्रकाश कधी आपण देणार आहोत?त्यांची मुलं बाळ चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण कधी घेणार आहेत?का ही मुलं हाच मरीआईचा गाडा डोक्यावर घेऊन सणासुदीला आपल्या दारात झोळी घेऊन भीक मागायला येणार आहेत. आज आपण सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आहोत. आग्रहाने फराळाला बोलवत आहोत. यांच्याही जीवनात हे दिवस कधी येतील. जगात विश्वगुरू होण्याचा दावा छाती ठोकून सांगणाऱ्या आपल्या सत्ताधाऱ्यांना व त्यांच्या चेल्या चपाटयांना त्यांचे दुःख समजेल तेव्हा खऱ्या अर्थाने हे दीपावलीचे प्रकाश पर्व आनंदाने साजरा करण्याचे धाडस आपल्यासारखी संवेदनशील माणसं करू शकतात. 

      गौतम बुद्ध आपली जन्मभूमी कपिलवस्तू येथे सम्यक संबोधी प्राप्त झाल्या नंतर १८ वर्षांनी परतले.तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी लाखो दिव्यांची आरास केली होती.याच दिवशी आपल्या शिष्यांना अत दीप भव(अप्प दिपो भव)हा संदेश त्यांनी दिला.याचाच अर्थ तुम्हीच तुमचे प्रकाश बना!दिवाळीला अंधकारावर प्रकाशाचा,अज्ञानावर ज्ञानाचा,वाईटावर चांगल्याचा विजय ही मानला जातो.तेव्हा याच उपेक्षित, वंचित व शोषित समूहासाठी आपण सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलून त्यांच्याही झोपड्यांमध्ये प्रकाश घेऊन जाण्याचे काम करूया. आपल्या घासातील एक घास त्यांनाही भरवू या. तेव्हाच हा दीपदानाचा महोत्सव सार्थकी लागला असे आपण म्हणू शकू.

सोमनाथ घोरपडे, सासकल, फलटण 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER