Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव वर्षांत हेच आमच्या वाट्याला आलं..... या प्रकाश पर्वाचा उजेड आमच्या झोपडीत कधी येईल?

टीम : धैर्य टाईम्स

सत्ता, संपत्ती, आणि प्रतिष्ठेच्या या बेगडी दुनिये मध्ये माणूस आणि माणुसकीचा अंत होत असताना काही बोटावर मोजण्यासारखे अपवाद वगळले तर गावकुसाबाहेर वाड्यावस्त्यांच्या बाहेर वंचित,शोषित, उपेक्षित समाजाचे दुःख घेऊन जगणाऱ्या या बारा बलुतेदार व अठरा आलूतेदारांमधील काही जातींची स्थिती फारशी सुधारलेली दिसत नाही._ 

        सामान्यपणे पाटील, कुलकर्णी हे सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने 'बारा बलुतेदार'म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्यांच्यावाचून शेतकऱ्‍यांचे नडत नाही, पण जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक गरजा भागवितात ते अलुतेदार. अलुतेदार हा अठरा जातींचा समूह आहे. यांचे महाराष्ट्रातील प्रमाण ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्ग (ओबीसी)मध्ये मोडतो. अलुतेदारांनाच ’नारू’ म्हणतात. कासार, कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भट,भोई,माळी,जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर,साळी या अठरा गाव कामगारांचा समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.

            गावगाड्यातील याच वंचित शोषित उपेक्षित समाजातील काही जात समूहांच्या जीवनात आजही अंधकार पसरलेला आहे. हेच मरीआईचे व लक्ष्मी आईचे पोतराज मरीआईचा गाडा घेऊन गावोगावी गुबू गुबू वाजवत अंगावर आसूडाचे (कोरड्याचा) फटके घेत देवीची उपासना करताना दिसतात. ते लोक गावोगावी आपल्या उदरनिर्वासाठी देवीच्या नावाखाली भीक मागण्याचे काम आजही करत आहेत. पूर्वी लोकांची दानत होती. लोक आपल्या दारात आलेल्या प्रत्येकाला सढळ हाताने मदत करायचे. आज मदत करणाऱ्या हातांना रोजगार नाही. शेत जमिनीचे तुकडे झाले. एकत्र कुटुंब पद्धती चे रूपांतर विभक्त कुटुंब पद्धतीत झाले. त्यामुळे प्रत्येक जण मी आणि माझे कुटुंब या पुरता सीमित झाला. या वंचित, शोषित, उपेक्षित समाजाच्या कुटुंबातील एखाद दुसऱ्या कुटुंबातील एखादा शिक्षित माणूस फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन हे अंधश्रद्धेचे जोखड फेकून आज तो स्थिरावला आहे. परंतु आजही गाव गावात नगरांमध्ये हे समूह मरीआईचा गाडा घेऊन दारोदारी आसूडाचे (कोरड्याचे) फटके घेत भिक मागताना दिसत आहेत. मी माझ्या वाढ वडिलांच्या काळात ही लक्ष्मी आईला पोतराज सोडल्याच्या गोष्टी ऐकल्या आहेत. माझे थोरले चुलते दिनकर घोरपडे हेही पोतराज म्हणून त्यांनाही देवीला सोडले होते.

         75 वर्षाच्या स्वातंत्र्याचा ढोल वाजवून अमृत बसून साजरा करत असताना आजही या या उपेक्षित, शोषित समाजातील बलुतेदार व अलुतेदार समाजातील काही जातसमुहांच्या वाट्याला हेच जगणे आले आहे. एका बाजूला ग्लोबलायझेशनची भाषा बोलणारे आपण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारे आपण त्यांच्यासाठी काय करू शकू याचा विचार कायम मनाला सतावतो. भ्रष्ट सत्तापीपासू राजकारण्यांकडून अपेक्षा करणे हे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे. त्यांना या समूहांना या दुःख, दैन्य व दारिद्र्यातून बाहेर काढण्याची मनापासून इच्छा नाही. आज हेच समूह उच्च शिक्षण घेतील. संघटित होतील आणि संघर्ष करायला लागले तर आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल याची त्यांना खात्री आहे. म्हणूनच या समूहांना ते जगूनही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत. आज संपूर्ण देशभर दिव्यांचा प्रकाश उजळलेला असताना, हे पर्व प्रकाशाचे पर्व आहे हे सुरू असताना हे वंचित, शोषित, उपेक्षित समाजातील घटक, ही माणसं आजही दारोदार भीक मागताना आपल्याला दिसत आहे. गेल्या 75 वर्षात हेच का आपण त्यांना दिलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर या समूहाच्या सामाजिक समतेसाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी खूप प्रयत्न केले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा! हा मूलमंत्र दिला. परंतु याचा खरा अर्थ या समूहांना आजही कळलेला दिसत नाही. त्यामुळे या लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत फारसा बदल झालेला दिसत नाही. पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यासारख्या भटक्या-विमुक्तांच्या न्यायी हक्कांसाठी लढणाऱ्या योद्धांमुळे काही प्रमाणात यात बदल होऊन आज ही कुटुंबे सन्मानाचे जीवन जगायला लागली आहेत. येणाऱ्या तरुण पिढीने याच लोकांसाठी काम करण्याची गरज आहे. फटाक्यांची आतिषबाजी, दारी रांगोळी, फराळाचं स्वादिष्ट आहार, दिव्यांची व पणत्यांची संपूर्ण आरास, नवीन कपडे, सुगंधी उठणे यात मश्गुल असणाऱ्या समाजाला या प्रस्थापित व्यवस्थेतील सत्ताधाऱ्यांना या माणसांचं दुःख खरच समजेल. हे लोक दोन पावलं उचलून या लोकांच्याकडे मदतीचा हात देतील. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून गेल्या 75 वर्षात आपण काय मिळवलं? एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या लोकांच्या झोपड्यामध्ये प्रकाश कधी आपण देणार आहोत?त्यांची मुलं बाळ चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण कधी घेणार आहेत?का ही मुलं हाच मरीआईचा गाडा डोक्यावर घेऊन सणासुदीला आपल्या दारात झोळी घेऊन भीक मागायला येणार आहेत. आज आपण सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आहोत. आग्रहाने फराळाला बोलवत आहोत. यांच्याही जीवनात हे दिवस कधी येतील. जगात विश्वगुरू होण्याचा दावा छाती ठोकून सांगणाऱ्या आपल्या सत्ताधाऱ्यांना व त्यांच्या चेल्या चपाटयांना त्यांचे दुःख समजेल तेव्हा खऱ्या अर्थाने हे दीपावलीचे प्रकाश पर्व आनंदाने साजरा करण्याचे धाडस आपल्यासारखी संवेदनशील माणसं करू शकतात. 

      गौतम बुद्ध आपली जन्मभूमी कपिलवस्तू येथे सम्यक संबोधी प्राप्त झाल्या नंतर १८ वर्षांनी परतले.तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी लाखो दिव्यांची आरास केली होती.याच दिवशी आपल्या शिष्यांना अत दीप भव(अप्प दिपो भव)हा संदेश त्यांनी दिला.याचाच अर्थ तुम्हीच तुमचे प्रकाश बना!दिवाळीला अंधकारावर प्रकाशाचा,अज्ञानावर ज्ञानाचा,वाईटावर चांगल्याचा विजय ही मानला जातो.तेव्हा याच उपेक्षित, वंचित व शोषित समूहासाठी आपण सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलून त्यांच्याही झोपड्यांमध्ये प्रकाश घेऊन जाण्याचे काम करूया. आपल्या घासातील एक घास त्यांनाही भरवू या. तेव्हाच हा दीपदानाचा महोत्सव सार्थकी लागला असे आपण म्हणू शकू.

सोमनाथ घोरपडे, सासकल, फलटण 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER