फलटण प्रतिनिधी - गेली ३५ वर्ष तालुक्यातील जनतेला विरोधकांनी विकासापासून झुलवत ठेवले होते. त्यामुळे तालुक्याचा राहिलेला विकासाचा बॅकलॉक आपण भरून काढणार असल्याचे सुतोवाच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. ते महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल निसर्ग सुरवडी येथे पार पडली त्यावेळी बोलत ते होते. बैठकीस आमदार सचिन पाटील,ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे - पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कृष्णा खोरे विकास मंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, माजी सरपंच विक्रम भोसले, मनिषाताई पांडे, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिह निकम, विलास नलवडे, दत्ताभाऊ धुमाळ, शहाजीतात्या भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना रणजितसिंह म्हणाले की, तालुक्यातील इंच ना इंच शेती ओलिताखाली आणायची आहे. इच्छाशक्ती असल्या नंतर हक्काचेच नाहीतर त्या पेक्षाही जास्त पाणी तालुक्यात आणता येते त्यासाठी मला तीस वर्षांची गरज नाही असा टोला आमदार रामराजे यांचे नाव नघेता लगावला. लवकरच जिल्हा परिषद गट निहाय बैठका घेऊन प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन विकासाचे उर्वरित कामे समजुन घेऊन ती कामे लवकरात लवकर मार्गी लावली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेत राहून लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे अशा सुचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केल्या.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या फलटण तालुक्यातील मंडल अध्यक्षांच्या निवडी माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांनी केल्या. फलटण तालुका भाजपला तीन नव्या मंडल अध्यक्षांची निवडी यावेळी जाहिर करण्यात आल्या. यामध्ये अमित रणवरे, लक्ष्मणराव सोनवलकर, विकास उर्फ बापूराव शिंदे यांना भाजपाने तालुक्यात मंडल अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.
अमोल सस्ते यांनी प्रास्ताविक व बजरंग गावडे यांनी आभार मानले.