फलटण प्रतिनिधी :
इतर तालुक्यातील गाव कुसाबाहेर टाकलेल्या पुढाऱ्यांना फलटण येथील कार्यकर्ता मेळाव्यास बोलावून राजकारणासाठी विरोधाला विरोध करून फलटण तालुक्यात होणारा विकास न पाहावल्याने व वैयक्तिक जळफळाटा पोटी श्रीमंत रामराजे यांनी विरोध करतानाच कालचा मेळावा म्हणजे फलटण तालुक्याचे वैचारिक अध:पतन असल्याचे मत फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी मांडले आहे. काल फलटण येथे झालेल्या विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यातील विधाना विषयी बोलताना अशोकराव जाधव यांनी विविध विषयांवर लक्ष वेधले.
पुढे अशोकराव जाधव म्हणाले की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याचा जलद गतीने होणारा विकास व आपली 30 वर्षाची नाकरती राजवट तालुक्यातील तरुण पिढीला दिसत आहे त्यामुळेच फलटण तालुकाच नव्हे तर संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघ आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. फलटण तालुक्याचे जनतेने विचार करण्याची गरज असून आज तरुण पिढीला राजकारणापेक्षा रोजगार व विकास महत्वाचा असल्याने पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच माढा लोकसभा मतदार संघातून निवडून देणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटण तालुक्यातील पुढाऱ्यांनी अपशकुनी राजकीय खेळ्या करून तालुका भकास करू नये कारण या आधीही दोन वेळा लोकनेते कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे बाबत असाच राजकीय कुट नीतीचा वापर केलेला फलटण तालुका विसरलेला नसलेचा आरोप यावेळी अशोकराव जाधव यांनी केला आहे.
तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळे टोकाची टीका टिपण्णी न करता पक्षाला जागा मागणे किंवा तिकीट मागणे काहीही गैर नाही तो लोकशाहीचा भाग आहे परंतु अंतिम निर्णयानंतर माशी शिंकली तर तालुका माफ करणार नसल्याचे अशोकराव जाधव यांनी शेवटी म्हटले आहे.