फलटण प्रतिनिधी -
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी निरा देवघर प्रकल्पाचा शेवटचा मास्टर स्ट्रोक मारत अशक्य होते ते शक्य करीत बहुचर्चित व अनेक वर्ष दुष्काळी भागाचा रखडलेला प्रकल्प खऱ्या अर्थाने सोडवला असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रक द्वारे कळविले आहे.
त्या प्रसिद्धी पत्रकार मध्ये पुढे पुढे असे म्हटले आहे की, दिनांक ३/१० /२०२३ रोजी केंद्रीय जलसंपदा विभागाच्या अर्थ व गुंतवणूक समितीची दिल्लीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस सुश्री देब श्री मुखर्जी, सचिव जलशक्ती मंत्रालय,उदय चौधरी निजी सचिव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता गुनाले, कार्यकारी अभियंता कोडलकर उपस्थित होते. हा प्रकल्प केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत PMKSY मध्ये समाविष्ट करणयाची शिफारस केली आहे, त्यामुळे या प्रकल्पाला केन्द्र शासनाचे ६० टक्के अनुदान प्राप्त होईल असे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचे ४० % अनुदान यापूर्वीच मंजुर केले आहे. राज्य सरकारने स्वतःचा वाट्याचा निधी उपलब्ध करून दिला व त्याचे प्रत्यक्षात टेंडर निघाले व लवकरच काम सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांचे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानत असल्याचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. हा प्रकल्प ३९६७ कोटी रुपयांचा असून मार्च अखेर टेंडर प्रोसेस होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे. माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवले जाणार व कायम दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे.