फलटण प्रतिनिधी :
सोमवार दिनांक १० जुलै रोजी सकाळी ८ वा. श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर पंढरपूर येथूून मा.आ.महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाच्या मिशन २०२४ अंतर्गत जन स्वराज यात्रेला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पंढरपूर तालुक्यातुन सुरुवात होऊन दि.१० आणि दि.११ दोन दिवस पंढरपूर-माढा-करमाळा- माळशिरस-सांगोला-माण-खटाव मार्गे फलटण अशाप्रकारे माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून शेकडो चारचाकी गाड्यांच्या ताफ्यात ही रॅली जाणार आहे.
११ जुलै रोजी सायंकाळी ५ वा माजी मंत्री महादेव जानकर यांची फलटण येथील मोती चौक परिसरात जाहीर सभा होणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मिशन २०२४ अंतर्गत प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक,धार्मिक, सांस्कृतिक शक्तिस्थळांना अभिवादन करत,जनतेशी संवाद साधत,त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघालेल्या या यात्रेला भव्य दिव्य पध्दतीने पार पडण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात या रॅलीचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील जनतेने जनतेसाठी आणि जनतेद्वारे सुरू केलेल्या जन स्वराज यात्रेत प्रचंड संख्येने सहभागी होवून सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी केले आहे.