फलटण करांनी 30 वर्षाच्या राजकीय सत्तेत काय केले? आणि जो करतोय त्याला फक्त नावं ठेवण्याच काम हे करत आहेत. गावागावात गट निर्माण होऊन त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचे काम यांनी केले असून आता राजकीय सत्ता हातात नसल्यामुळे फक्त आणि फक्त न झालेले विकासाचे काल्पनिक चित्र लोकांसमोर उभे केले जात आहे यावर लोक किती दिवस विश्वास ठेवणार : खा. रणजितसिंह
फलटण तालुक्यातील श्रीराम साखर कारखाना जवाहरला चालवायला दिला , श्रीमंत मालोजीराजे बँक बुलढाणा अर्बनला चालवायला दिली तर तालुका दूधसंघ देशोधडीला लावत फलटण तालुक्यातील सहकार चळवळ मोडली असून कोणतीही नवीन संस्था यांनी निर्माण केली नाही तर केवळ सर्वसामान्य लोकांना केवळ भुलथापा मारत फलटणचे अधिपती यांनी फलटण तालुका अधोगतीला नेहला असल्याचे रणकंदन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. ते फलटण तालुका संपर्क दौऱ्यात बरड येथील सभेत बोलत होते.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी सरपंच जनार्धन लोंढे, विष्णुपंत गावडे, विठ्ठल माने विष्णू सूळ, यांच्या सह बरड, आंदरुड, जावली,दत्तनगर, नाईकबोमवाडी, मिरढे, राजुरी, शेरेशिंदेवाडी आदी भागातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. रणजितसिंह पुढे म्हणाले की, गोविंद चालण्यासाठी सहकारी दूध संघ अडचणीत आणला, श्रीरामचीही वेगळी परिस्थिती नाही तो सुद्धा जवाहरच चालवतोय तर श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक बुलढाणा अर्बन चालवत आहे अशा अनेक संस्था दुसर्याने चालवीने योग्य नसून आपले कर्तृत्व काय असा प्रश्न उपस्थित करीत शेजारची बारामती विकासाच्या दृष्टीने पुढे असून खर तर त्यांच कौतुक केले पाहिले त्यानी विकास तरी केला फलटण करांनी 30 वर्षाच्या राजकीय सत्तेत काय केले? आणि जो करतोय त्याला फक्त नावं ठेवण्याच काम हे करत आहेत.
गावागावात गट निर्माण होऊन त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचे काम यांनी केले असून आता राजकीय सत्ता हातात नसल्यामुळे फक्त आणि फक्त न झालेले विकासाचे काल्पनिक चित्र लोकांसमोर उभे केले जात आहे यावर लोक किती दिवस विश्वास ठेवणार. या त्यांनी केलेल्या चुका आपल्याला भविष्यात करायच्या नाहीत फलटण तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी तालुक्यातील तमाम जनतेची मला विकास कामासाठी साथ द्यावी असे आवाहन खासदार यांनी केली.