गेली 25 ते 30 वर्ष तालुक्यातील जनतेला पाणी प्रश्नावर फसवत ठेवल्याने त्याचा भांडाफोड होत असल्याने आ.रामराजे हे जाणीवपूर्वक खासदारांनी केलेल्या विधायक कामावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा स्वरूपाची जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत. विरोधी पक्ष नेते आ. अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मामाचे घर असलेल्या फलटण येथील नाईक निंबाळकर परिवारातून असलेल्या आ.रामराजांनी मूग गिळून बसणे पसंत केले
काल वाठार - निंबाळकर (फलटण ) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्या प्रसंगी नाभिक समाजाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती आ.रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले वक्तव्य हा शूरवीर जीवा महाले व संत सेना महाराजांचा अवमान आहे त्यामुळे आपण त्यांचा जाहीर निषेध करत असल्याचे फलटण नगर परिषदेचे मा. नगरसेवक व भाजपा अल्पसंख्याक सेल विभाग राज्य उपाध्यक्ष अनुप शहा यांनी धैर्य टाईम्सशी बोलताना सांगितले.
फलटण ( वाठार - निंबाळकर ) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये आ.रामराजे नाईक निंबाळकर यांनी हातवारे करत नाभिक समाजाबद्दल वक्तव्य करून वीर जीवा महाले यांचे वंशज व संतसेना महाराज यांचे अनुयाई असलेल्या नाभिक समाजाबद्दल वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे, त्यामुळे आ.रामराजेंचा आपण जाहीर निषेध करत असल्याचे अनुप शहा यांनी म्हटले आहे.
वास्तविक माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे तालुक्यामध्ये करत असलेले विकासात्मक कामे बघून राजे गटाच्या पायाखालची वाळू सरकली असून आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये पराभव समोर दिसत असल्याने आ. रामराजे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. तसेच गेली 25 ते 30 वर्ष तालुक्यातील जनतेला पाणी प्रश्नावर फसवत ठेवल्याने त्याचा भांडाफोड होत असल्याने आ.रामराजे हे जाणीवपूर्वक खासदारांनी केलेल्या विधायक कामावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा स्वरूपाची जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत खरंतर आ. अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मामाचे घर असलेल्या फलटण मधील नाईक निंबाळकर परिवारातील आ.रामराजांनी मूग गिळून बसणे पसंत केले पण स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या जीवा महालांच्या वंशजावर असे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे अनुप शहा यांनी म्हटले आहे. कदाचित रामराजेंच्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धिमत्तेवर होऊ लागला असल्याची खरमरती टीका शेवटी अनुप शहा यांनी केली आहे.