पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथे भेट घेत माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नासंदर्भात चर्चा करतानाच महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यातील विविध जलसिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लागावेत याकरिता निवेदन दिले यावेळी खासदार रणजितसिंह यांच्या बरोबर त्यांच्या सुविद्यपत्नी अँड सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, कन्या ताराराजे व इंदिराराजे उपस्थित होत्या.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव पॅकेजची मागणी केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र ,तेलंगाना, या राज्यांमध्ये सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरू असून या वादात तेलंगाना राज्य सरकार ,सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी केंद्रशासन स्तरावर प्रयत्न करावा अशी अपेक्षा यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केली.
कृष्णा - भीमा स्थैरीकरण योजना प्रकल्प मार्गी लावावा यासाठी विशेष योजना तयार करून या 55 दुष्काळी तालुक्यासाठी विशेष पॅकेज देऊन हे सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
राज्य सरकारने निरा- देवघर या प्रकल्पास सुप्रीमा देऊन निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे हे यावेळी निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पास आता केंद्र शासनाकडून सुद्धा निधीची तरतूद व्हावी व या दुष्काळी पट्ट्यातील हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा अशी ही मागणी निवेदनात केली आहे.
तसेच या दुष्काळी पट्ट्यातील धोम - बलकवडी हा प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून आत्ता आठमाही होणार आहे तो बारमाही करण्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा या निवेदनात करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे - काटापुर योजनेसाठी निधी दिलेला असल्यामुळे हा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी निदर्शनास आणून दिले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाचा आपण दौरा करावा अशी अपेक्षा यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केली. कृष्णा - भीमा स्थैर्रीकरण हा प्रकल्प लवकर मंजूर व्हावा व कृष्णा लवादाच्या निर्णयानुसार एका नदीच्या खोऱ्यातील पाणी दुसऱ्या नदीच्या खोऱ्यात वळवता येत नसल्याने कृष्णा - भीमा स्थैर्रीकरण योजना पूर्णत्वास नेण्यात येत असलेल्या अडचणी दूर करून यावर उपलब्ध पाणी वाटपाची फेररचना कृष्णा - पाणी तंटा लवाद आयोगाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यासाठी या आयोगाचा अहवाल महत्त्वाचा असल्याची बाब खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिली. या आयोगावर पंतप्रधान मोदींनी लक्ष घालण्याची विनंती यावेळी खासदार रणजितसिंह यांनी केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुके कायमस्वरूपी सिंचनाखाली येणार असल्याने शेतकर आर्थिक दृष्ट्या संपन्न होईल अशी अशा यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केली.
बजेटमध्ये फलटण - पंढरपूर रेल्वे बाबत तरतूद झाली असून रेल्वेचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी संबंधित विभागास आपण सूचना दयावेत अशी ही विनंती खासदार रणजितसिंह यांनी केली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.