फलटण प्रतिनिधी - दिनांक 24 एप्रिल, धैर्य टाईम्स
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी या उद्देशाने आम्ही सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ज्यांची कसलीच ताकद नाही जे साधे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार देखील नाहीत अशा लोकांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवून निष्कारण ही निवडणूक सभासदांवर लादण्याचा प्रयत्न केला आहे : श्रीमंत संजीवराजे
फलटण प्रतिनिधी नुकत्याच होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे यांनी आपल्या भाषणात केले.
आज श्रीराम मंदिर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. याप्रसंगी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, यशवंत बँकेचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र भोईटे इ. मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी या उद्देशाने आम्ही सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ज्यांची कसलीच ताकद नाही जे साधे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार देखील नाहीत अशा लोकांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवून निष्कारण ही निवडणूक सभासदांवर लादण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे बाजार समितीच्या पैशाचा अपव्यय होणार आहे. असे सांगून श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, आज आमच्याकडे जवळपास 90 टक्के मतदान आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमचा विजय प्रचंड मताधिक्याने होणार असल्याचे ही शेवटी श्रीमंत संजीवराजे यांनी भाषणामध्ये सांगितले.