रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरण व नूतनीकरणासाठी अमृत भारत स्थानक योजना या शिर्षकाखाली नवीन धोरण तयार केले आहे. यामध्ये देशातील मोजकीच रेल्वे स्थानके असून फलटणचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे फलटण रेल्वे स्थानकाचा समावेश महत्वपूर्ण अमृत भारत स्थानक योजनेत करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांनी दिले.
रेल्वेमंत्री ना. अश्विन वैष्णव यांच्या संसदेमधील दालनामध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व पत्रकारांशी रेल्वेच्या सुधारणा आणि फलटण - पंढरपूर नवीन रेल्वे मार्ग, लोणंद - फलटण - बारामती रेल्वे मार्ग याविषयी माहिती देताना रेल्वे मंत्री ना. अश्विन वैष्णव बोलत होते. माजी खासदार स्व. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेली फलटणची रेल्वे ही त्यांचे सुपुत्र व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अथक परिश्रम घेत सुरु केली. त्यानंतर आता फलटण वरुन फक्त लोणंद नव्हे तर पुणे,
फलटण- मुंबई या मार्गावर नवीन रेल्वे फेऱ्या सुरु करणार असून फलटण चे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता येथे ऐतिहासिक स्वरूपात, व छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडीत ही इमारत उभी करणार आहे, याचा आराखडा स्वतः खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या सुचनेने करावा आम्ही परवानगी देऊ अशी ग्वाही ना. आश्विन वैष्णव यांनी दिली.
भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आगामी काळामध्ये फलटण पंढरपूर व फलटण - बारामती रेल्वे सुद्धा पूर्णत्वास जाणार असून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार लवकरच आपण फलटण येथे वरील मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी येणार आहे, असे मंत्री आश्विन वैष्णव यांनी स्पष्ट केले.
भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश
स्थानक योजनेचे उद्दिष्ट रेल्वे स्थानकांचा बृहत आराखडा तयार करणे, त्याची टप्याटप्याने अंमलबजावणी करणे, किमान अत्यावश्यक सुविधा आणि अन्य सुविधांचा विस्तार, स्थानकावर रुफ प्लाझा आणि सीटी सेंटर निर्माण करणे हे असून खा. रणजितसिंह यांच्या आग्रहामुळे फलटण रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश करणार असून पुणे नंतर या योजनेत समावेश होणारे महराष्ट्रातील फलटण हे दुसरे स्थानक असेल अश्विन वैष्णव यांनी निदर्शनास आणून दिले. खा. रणजितसिंह यांनी ऐतिहासिक स्वरूपात इमारत उभारण्याच्या दृष्टीने याचा नकाशा करावा त्याला आमचा होकार असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. खा. रणजितसिंह यांनी आश्विन वैष्णव यांच्याकडे आपण फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याची मागणी केली असता त्यांनी अर्थसंकल्पात याबाबत तातडीने तरतूद करून फलटणकर जनतेला अनमोल भेट दिली आहे. फलटणच्या रेल्वेसाठी आश्विन वैष्णव यांचे योगदान विसरता येणार नाही, असे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगून अमृत भारत योजनेत फलटणचा समावेश केल्याबद्दल रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत.