फलटण प्रतिनिधी:- वाखरी ता. फलटण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील इमारतीचा प्रश्र दिवसेंन दिवस जटील होत चालला आहे. शाळेच्या नवीन वास्तू च्या बाबत अद्यापी ठोस संस्था चालक व ग्रामस्थामधे तोडगा निघाला नाही. ग्रामस्थाच्या सांगण्या प्रमाणे तात्काळ अद्यावत इमारती बाबत कार्यवाही शासन व संस्था पातळीवर व्हावी यासाठी वाखरी येथील पालक व ग्रामस्थ व पाल्य यांचेसह तुकाराम शिंदे याच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. ३१ रोजी सातारा येथे पालक मंत्री ना. शुंभराजे देसाई यांची भेट घेणार आहेत.
हायस्कूलच्या जिर्ण झालेल्या इमारती बाबत वाखरी येथील हायस्कूलच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायतीच्या ठरावा नुसार सोमवारी दि ३१ रोजी सातारा येथे पालकमंत्री सह संबंधित शासकीय अधिकारी यांना पडझड झालेल्या इमारतीबाबत निवेदन देऊन विनाविलंब शासन स्तरावर तोडगा काढण्याचा निर्णय पालक मेळाव्यात घेण्यात आला.
यावेळी तुकाराम शिंदे म्हणाले की, जरी फॉरेस्ट च्या जागेत इमारत उभी असली तरी संस्था अनेक कारणे सबबी सांगून जिर्ण झालेली इमारत नवीन बांधकाम स्थितीत करत नाहीत पूर्वीची इमारत खूप जूनी आहे मोडखळ झाली आहे पाऊसामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारताजागेबाबत प्रश्र संस्था चालकांची सोडविण्याची मानसिक ता दिसत नाही म्हणूनच आपण सर्व विद्यार्थ्यी मुला सह पालकांनी सातारा येथे जावून युद्धपातळीवर आपला प्रश्र आंदोलनच्याव्दारे शासनकर्ते यांच्या निर्देशनास आणून एकदाचा निघाली काढू.
यावेळी स. रा.मोहिते, रामचंद्र ढेकळे, पप्पू ढेकळे, लाला ढेकळे, बिचुकले, संतोष ढेकळे, जाधव सर, अमित गायकवाड, शिवाजी गायकवाड, गणपत मोहिते, इंदलकर गुरुजी, नाना महाराज ढेकळे व अन्य ग्रामस्थ पालक यांनी शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत पुढील रणनिती काय ठेवावी यासाठी आपले विचार व्यक्त केले. दरम्यान याच वेळी श्रीराम एज्युकेशन संस्था चालक संस्थेचे सचिव व स्टाप वाखरी येथील पालक मेळाव्या मधे उपस्थित राहून आपले म्हणने मांडण्यासाठी आले.
यावेळी ग्रामस्थ व पालकांना मार्गदर्शन करताना सचिव सचिन सुर्यवशी उर्फ बेडके म्हणाले की वाखरी येथील इमारतीच्या बाबत आम्ही गेले २०१९ पासून या वास्तुसाठी पाठपुरावा करत आहोत एकतर सदर इमारतीची जागा फॉरेस्ट जागेत बांधल्यामुळे नवीन इमारत उभी करणे फार गुंतागुंत झाली आहे नवीन इमारत जागेसाठी आमचे प्रयत्न चालु आहेत. गावकर्यांनी चांगला मार्ग काढला तर मी तुमच्या बरोबर राहीण.
यावेळी प्रविण ढेकळे म्हणाले गेले ३० वर्षे संस्था इमारती बाबत व अन्य सोई करत नाही संस्थेने गावच्या राजकारणाचा फायदा करून घेतला म्हणूनच आम्ही शेवटचा उपाय म्हणूनच सातारा येथे सर्व आमच्या लहान पाल्यासह ग्रामस्थ पालक व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचा मोर्चा घेऊन पालक मंत्री यांच्याकडे आमची तक्रार मांडण्यासाठी मोठ्या संस्थने सातारा येथे उपस्थित राहणार आहोत असे सांगितले.