खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याला नक्कीच फायदा होईल व माढा लोकसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या व शेती पाण्याच्या जे उर्वरित प्रश्न आहेत ते सुद्धा या निमित्ताने पूर्ण होतील. या निवडीमुळे मतदार संघातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे - जयकुमार शिंदे
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची देशाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत पाणी वाटप पॉलिसी ठरवणाऱ्या कमिटी वर विशेष निमंत्रित सदस्य पदी निवड झाली असल्याची माहिती सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी एका प्र्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
देशाच्या शेती पाण्याच्या प्रश्नावर विविध धोरणे ठरवणे, यामध्ये नदीजोड प्रकल्प, धरणे, पाण्याचे स्त्रोत्र ठरवणे, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना ठरवणे ,जल जीवन मिशन अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हर घर जल ही योजना राबवणे, दुष्काळी पट्ट्यातील जनतेला शेती पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा अभ्यास करणे, ज्यादा पाऊस झाल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यावर अभ्यास करून ते कशा पद्धतीने ते वाहून जाणारे पाणी वापरता येईल यावर अभ्यास करणे केंद्र व राज्य यांच्यामध्ये समन्वय ठेवून पाण्याची धोरणे ठरवणे अशा अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे या कमिटीच्या माध्यमातून घेतले जातात. अशा महत्वाच्या कमिटीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या निवडीमुळे महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याला नक्कीच याचा फायदा होईल माढा लोकसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या व शेती पाण्याच्या जे उर्वरित प्रश्न आहेत ते सुद्धा या निमित्ताने पूर्ण होतील. या निवडीमुळे मतदार संघातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशी माहिती सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली आहे.