फलटण प्रतिनिधी:- स्वातंत्र्याच्या काळापासून रखडलेला हा रेल्वेचा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी भूमिका घेऊन सोडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलं त्यामध्ये कै.माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर व अन्य नेते व जनतेचे स्वप्न पूर्ण करताना मला आज आनंद होत आहे असे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी सांगितले.
गेली अनेक वर्ष रखडलेल्या फलटण ते बारामती या रेल्वेच्या जमिनीच्या अधिग्रहणानंतर रेल्वे लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून मी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 600 कोटी रुपये मंजूर करून दिले व त्याची निविदा कालच प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या महिन्यामध्ये रेल्वेचे ब्रिज तयार करण्याचे निविदा प्रसिद्ध झाली होती. त्याचे काम प्रत्यक्षामध्ये सुरू झाले. यानंतर आता रेल्वे लाईन टाकण्याचं काम प्रत्यक्षात आता सुरू होईल. लोणंद फलटण रेल्वे सुरू आहे आता बारामतीकडे रेल्वे सुरू झाल्यानंतर फलटणकरांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना आपण पाहणार आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, यांचे खूप मोठे सहकार्य या कामी लाभलेले आहे. फलटण तालुका हे रेल्वेचे मुख्य ठिकाण होणार आहे .या ठिकाणी अमृत स्टेशन योजना मंजूर झालेली आहे .त्यामुळे या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही .दक्षिणेकडून जाणाऱ्या सर्व रेल्वे फलटण, मार्गी दिल्लीला जाणार त्यामुळे जनतेचा आर्थिक विकास होणार आहे. शेतकरी व्यापारी, विद्यार्थी, नोकरवर्ग, सर्वसामान्य प्रवासी, या सर्वांनाच याचा फायदा होणार आहे व फलटण हे देशाच्या नकाशावर दळणवळणाचे मोठे साधन म्हणून दिसणार आहे. इथून फलटण वरून मुंबई, पुणे, नोकरीसाठी, शिक्षण , व्यवसायासाठी, शेतकऱ्यांना माल पोचवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. जनतेने दिलेल्या प्रेमातून उतराई होण्यासाठी जेवढं या मतदारसंघासाठी काय करता येईल तेवढे काम मी जनतेसाठी करणार आहे असे मत खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.