भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष पुरस्कृत विडणी विकास आघाडी शिवाय विडणीच्या विकासाला पर्याय नसल्याचे विडणी ग्रामपंचायत मधील मतदारांनी प्रचारात भरघोस प्रतिसाद देत विडणी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे अभिवचन दिले आहे.
विडणी विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार सागर कांतीलाल अभंग यांच्यासह विविध वार्डमधील उमेदवार यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे. त्यावेळी मतदारांकडूनच विडणी गावच्या विकासाला सत्ता बदला शिवाय पर्याय नसल्याचे बोलून दाखविले आहे.
जवळपास दहा हजार मतदार संख्या असणाऱ्या विडणीसारख्या मोठ्या प्रगतशील गावामध्ये मूलभूत सुविधांची वाणवा असल्याने नक्की सत्ताधिकाऱ्यांनी काय केले हा प्रश्न आता दस्तुरखुद्द मतदारांना पडला आहे. त्यामुळे विडणीच्या ग्रामपंचायत मध्ये सत्ता बदल निश्चित असल्याचे बोलले जात आहे.