Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील

माजी आमदार कै. चिमणराव कदम यांचा गट काळाच्या ओघात नामशेष : निष्ठावंत कार्यकर्त्यांचे दुःख

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : फलटणचे माजी आमदार कैलासवासी सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे. सामान्य माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या व्यथा वेदना जाणून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झटणारा तत्त्वनिष्ठ, परखड विचाराचा नेता म्हणूनही ते ओळखले जात होते.अनेकदा त्यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्या त्या सत्राचा सर्वात उत्कृष्ट नेता म्हणूनही गौरवले होते. फलटणच्या गजानन चौकात चिमणरावांची सभा म्हटलं की सर्व रस्ते गर्दीने तुडुंब भरायचे. खरे तर चिमणराव शब्दांचे जादुगार होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्यानंतर असा परखड विचाराचा नेता फलटणला नव्हे तर सातारा जिल्ह्याला लाभला नाही हेही तितकेच खरे. 

फलटण विधानसभा मतदार संघातून १९८०,१९८५ व १९९० साली ते विजयी झाले. तर १९९५ साली त्यांना तब्ब्ल ४२३६७ मते मिळाली होती मात्र त्या वेळी त्यांचा पराभव झाला. तब्बल २५ वर्षाहून अधिक काळ चिमणराव कदम फलटणच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. गांधी घराण्याशी जवळचे संबंध जपत राजकीय वाटचाल चिमणराव कदम यांनी सुरू ठेवली होती. एकेकाळी काँगेसची मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्या चिमणराव कदम यांची संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा होत होती.

मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून इतर पक्षात दिसू लागले. एकूण त्यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा सांभाळणारा सक्षम वारस मिळावा नसल्याने त्यांचा राजकीय गट आज जवळपास नामशेष झाल्याचे त्यांचे निकटचे कार्यकर्ते सांगतात. 

जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चिमणराव कदम यांनी फलटणच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री गरिबांच्या झोपडीत पर्यंत नेहली. तर गरीब बहुजन वर्गातील अनेकांना चिमणराव यांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर नेहमीच मतांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. उमेदीच्या काळात त्यांचा असणारा दरारा आज पाहायला मिळत नाही. 

चिमणराव कदम यांचे चिरंजीव व जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री कदम यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला खरा परंतु ते नेमके कोणत्या पक्षात आहेत हेच मुळी मोठे कोडे आहे. चिमणराव कदम यांच्या सारखा धाक आणि दरारा त्याचबरोबर राजकीय प्रगल्भता नसल्याने साहेबांचा मतदार मात्र आज काळाची पावले ओळखून आपल्या सोयीनुसार इतरत्र दिसू लागला आहे. 

एकेकाळी तालुक्यात मोठा दरारा व मोठा मतदार वर्ग असणारा कदम गट सध्या आस्तित्वाची लढाई लढत आहे. चिमणराव कदम यांच्या मागे हजारोंचा गठ्ठा मतदान असणारा गट सध्या अंतर्गत नाराजीमुळे त्रस्त आहे. जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कर्मचारी वर्ग यांच्या जोरावर चिमणराव कदम यांनी राजकीय वाटचाल चालू ठेवली होती पण तीच वाटचाल आता सह्याद्री कदम यांना जपता येत नाही हे स्पष्ट झाले आहे. 

कै.चिमणराव कदम यांनी अनेक तरुणांना रोजगार व नोकऱ्या देऊन एक मोठा गट उभा केला होता तो गट सह्याद्री कदम पिढ्यान् पिढ्या न जपता नाराज केला आहे. लोकसभा निवडणूका, विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सर्व निवडणुका अशा अनेक निवडणुका मध्ये सतत भूमिका बदलत कधी या गटात तर कधी त्या गटात अशी विविध पक्ष बदलणारी भूमिका घेतल्याने फलटण तालुक्यांतील चिमणराव कदम यांच्या विचाराला मानणारा वर्ग गटापासून दूर चालला आहे. जो माणूस काळाची पावले ओळखत नाही तो माणूस काळाच्या आड होतो ही कल्पना सह्याद्री कदम यांना होताना दिसत नाही.

कर्मचारी वर्ग व कदम गट यांना मानणारा वर्ग यांना मनापासून जपणे हे कदम गटाच्या पुढील पिढीला न जमल्याने स्वतःला कदम गटाचे किंगमेकर समजणे हास्यास्पद आहे. नको त्या व्यक्तींचे नको ते ऐकणे यामागचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. ज्या सल्लागारांनी तालुक्यांतील अनेक राजकीय घराण्याची राजकीय वाटचाल नको तो सल्ला देऊन संपवल्याने सह्याद्री कदम यांनी वेळीच सावध होऊन ओळखायला हवे आहे असे साहेबांवर प्रेम करण्याऱ्या निष्ठावंत नेत्याने सांगितले. एकंदरीतच सद्यस्थितीत राजकीय परिस्थिती पाहता फलटण तालुक्यात जनतेच्या मनातील अपेक्षित तिसरा पर्याय नसल्याचे दिसत असल्याची खंत अनेक जण व्यक्त करतात.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER