नीरा - देवधर धरणाविषयी बोलताना धैर्यशील मोहिते - पाटील म्हणाले, या धरणासाठी विजयदादा व रामराजेंनी १९८४ पासून प्रयत्न केले. जमिनीचे अधिग्रहण करुन घेतले. मध्यंतरी १५ - २० वर्षे विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यपाल महोदयांनी पश्चिम महाराष्ट्रातील योजनांना स्टे दिला. त्यामुळे निधी मिळाला नाही म्हणून ही योजना रखडली.
फलटण प्रतिनीधी - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब व विजयदादा यांनी टाकलेला विश्वास माढा लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेल्या पाठींब्याच्या जोरावर ४ जूनला गुलाल आपलाच उधळला जाईल असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.
माढा लोकसभा मतदारसंघाच्या झंझावती प्रचार दौ-याची आज उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना मोहिते पाटील म्हणाले, नेते कुठेही असू द्यात, जनता आमच्या पाठीशी आहे. गेल्या पंधरा दिवसात विजयदादा व बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदार संघातील ८३५ गावांचा आपण झंझवती प्रचार दौरा केला. महाविकास आघाडील नेत्यांनी प्रचाराची बाजु संभाळली. त्यांच्या प्रचार सभांना जनतेने उत्स्फुर्त पाठिंबा दिला व या सभा यशस्वी केल्या. जनतेनेच ही निवडणुक हातात घेतल्याने आमचा विजय निश्चित आहे .
२०१९ ला पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील सहा जिल्हे व ३१ दुष्काळी तालुक्यातील शेतीला कृष्णा - भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून पाणी मिळावे यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला. यामध्ये आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नव्हता. पक्षाने लोकसभेला दिलेल्या उमेदवाराला एक लाख १६ हजार मतांचे मताधिक्य देवून विजयी केले. अटीतटीच्या लढतीत एका रात्रीत नवख्या सातपुतेंना आमदार केले. जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आणली. तीन नगरपालिका व माळशिरस पंचायत समितीत भाजपाची सत्ता आणली. तरीही आम्हाला गद्दार म्हटले जाते. ज्यांना खासदार म्हणून आम्ही निवडून दिले त्यांना त्यांच्या तालुक्यात एक ग्रामपंचायत सुध्दा आणता आली नाही आणि माढा लोकसभेतील नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी साधा उमेदवारही मिळाला नाही. तरीही ते निष्ठावंत ? वारे न्याय अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ना देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी आमच्या मनात कोणताही राग अथवा द्वेश नाही पण खा नाईक निंबाळकर, आ.जयकुमार गोरे व आ. श्रीकांत भारतीय यांनी आमच्या विषयी चुकीची माहिती देवून नेतृत्वाचे कान भरले हे चुकीचे आहे. काल पर्यंत आम्ही चांगले होतो पक्ष सोडला की गुंड झालो काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नीरा - देवधर धरणाविषयी बोलताना मोहिते पाटील म्हणाले, या धरणासाठी विजयदादा व रामराजेंनी १९८४ पासून प्रयत्न केले. जमिनीचे अधिग्रहण करुन घेतले. मध्यंतरी १५ - २० वर्षे विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यपाल महोदयांनी पश्चिम महाराष्ट्रातील योजनांना स्टे दिला. त्यामुळे निधी मिळाला नाही म्हणून ही योजना रखडली. आता हा स्टे उठला आहे. नीधी आला आहे. त्यामुळे नीरा - देवधर योजना सुरु झाली. पवार साहेब, विजयदादा, रामराजे यांनी कधी श्रेयासाठी काम केले नाही. परंतु अलिकडे काम न करता पाणीदार, जलनायक अशा बिरुदावली लावून फिरणारे वाढले आहेत असे म्हणत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. गोरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
लोणंद - पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सोडविला म्हणणा-या खासदारांनी पुणे - फलटण रेल्वेच्या गेटवर साधा गेटमन नेमला नाही. रेल्वेचा ड्रायव्हरच गेट उघडतो व बंद करतो अशी सध्या शोकांतीका आहे असे सांगून केंद्राच्या अनेक योजना आहेत. त्यातीलच एक अंध - अपंग लोकांसाठी योजना होती . आपण माळशिरस तालुक्यात १०० टक्के ती यशस्वी केली. लोकांना लाभ मिळवून दिला . परंतु सातारा जिल्ह्यात खासदारांना योजनाच माहित झाली नाही. प्रशासनाने ती राबविल्यावर यांना कळले. आज खालच्या पातळीवर जावून आमच्यावर टीका करतात, आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते परंतु आमच्या घरावर सहकार महर्षीचे संस्कार आहेत,पवार साहेब व विजयदादांनी सांगितले आहे की आपण पातळी सोडून बोलायचे नाही म्हणून आम्ही गप्प आहे. जनता आता दुधखुळी राहिली नाही. येत्या सात तारखेला मतदानाच्या माध्यमातून ती माढा लोकसभेत नक्कीच परिवर्तन घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माढा लोकसभेतील शेती व शेतक-यांच्या शेतीला पाणी, युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रत्येक तालुक्यात मिनी एम.आय.डी.सी. केळी संशोधन केंद्र, किसान रेल्वे आदी प्रश्नाबाबत आपण सतर्क राहून काम करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.