विरोधी पक्ष ही भारतीय लोकशाहीतील संजीवनी असून विरोधी पक्षांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो मात्र अलीकडच्या काळामध्ये केंद्रातील भाजपा सरकार विरोधकांना बोलूच देत नाही त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करणारी कृती हे भाजपाचे मोठे षडयंत्र असल्याने या कृतीचा फलटण शहर व काँग्रेसच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी - (बेडके) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर अन्याय केलेच्या पार्शवभूमीवर आज फलटण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सूर्यवंशी - बेडके बोलत होते. यावेळी महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) अध्यक्ष फलटण तालुका, पंकज पवार अध्यक्ष, फलटण कॉंग्रेस शहर, शंकरराव लोखंडे, सरचिटास जिव्हा काँग्रेस, अमिरभाई शेख - कार्याध्यक्ष फलटण तालुका, राजेंद्र खलाटे उपाध्यक्ष फलटण ग्रामीण, अशोकराव शिंदे, उपाध्यक्ष फलटण शहर गंगाराम रणदिवे, सरचिटणीस युवक काँग्रेस सातारा जिल्हा अजिंक्य कदम, अध्यक्ष युवक काँग्रेस फलटण तालुका प्रितम जगदाळे, शहराध्यक्ष युवक काँग्रेस, अल्ताफ पठाण, फलटण शहराध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग, मनोहर गायकवाड, सरचिटणीस, फलटण तालुका, अभिजित जगताप, फलटण तालुकाध्यक्ष अनुसुचित जाती-जमाती सेल, विकास ननवरे - शहर अध्यक्ष ओबीसी सेल बालमुकुंद भट्टड, खजिनदार फलटण तालुका काँग्रेस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना सूर्यवंशी - (बेडके) म्हणाले, देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून दोन उद्योगपती देश चालवीत आहेत आणि मोदी - शहा या उद्योगपतींना अभय देत आहेत. या उद्योगपतींच्या माध्यमातून मिळणारा पैसा भाजप पक्ष वापरतोय म्हणून या उद्योगपतींचा विषय संसदेत विरोधकांनी घेतला तरी या प्रश्नाचे उत्तर सरकार देत नाही, खरे तर लोकशाहीत विरोधकांनी संसदेत विचारलेली प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. मात्र सरकार का घाबरते असा सवाल करीत सरकारचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे संसदेत दिली तरच हे लोकशाहितील सरकार आहे असे म्हणता येईल असे सूर्यवंशी - बेडके म्हणाले. प्रत्येक भारतीय नागरिक कर रूपाने सरकारच्या तिजोरीत पैसा देतात मग या पैशाचा हिशोब मागितला तर सरकारने हिशोब दिला पाहिजे. राहुल गांधीची लढाई सरकारच्या लोकशाहीतील एकाधिकारशाही विरोधाची आहे. त्यामुळे भाजपाने राहुल गांधींची खासदारकी रद्द करून त्यांची नाहक बदनामी केली असल्याचा आरोप यावेळी सचिन सूर्यवंशी - बेडके यांनी केला. सध्या भाजपाचे देशातील काँग्रेसवर आकांड तांडव सूरू आहे. विद्यमान केंद्र सरकारने आपल्या कामाची पद्धत विरोधकांना विश्वासात घेऊन सुधारली पाहिजे अन्यथा आगामी काळामध्ये देश राज्य,जिल्हा,तालुका स्तरावर भाजपा विरोधी आंदोलने करण्यात येतील असा इशारा यावेळी सूर्यवंशी - बेडके यांनी दिला.