सचिन मोरे :
भारतीय राज्य घटनेची शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल मग ती गुलामी सामाजिक असेल किंवा राजकीय, अशीच काहीशी परिस्थिती फलटण तालुक्यात झाली असून राजकीय हक्कासाठी बौद्ध समाज आक्रमक झाल्याने, समाजाच्या उठावाने अनेकांची मती गुंग झाल्याचे झाली आहे. फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघ २००९ पासून अनुसूचित जाती करीता राखीव आहे. मात्र गेली तीन टर्म एकाच समाजाला प्रतिनिधित्व मिळत असल्याने बौद्ध समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे फलटण मधील नेते हवालदिल झाल्याचे चित्र दिसत असल्याचे बोलले जात आहे.
दलित समाजाची मते म्हणजे आपल्या खिशातील मते असा अविर्भाव अनेक नेत्यांना होता. मात्र आता हेच मतदार आता आपल्या राजकीय हक्कासाठी जागृत झाल्याने अनेकांच्या हृदयाची धडधड वाढल्याची जाणीव होऊ लागली आहे. बौद्ध समाजाच्या मागणीचा विचार नकरता, ज्यांना बौद्ध समाजाच्या मतांची गरज नाही अशा राजकीय नेत्यांनी विधानसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. साठ हजाराहून अधिक मतदान असणारा बौद्ध समाज आरक्षित जागेवर आपला हक्क सांगत असताना त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावरून राजकीय पक्षांची व पुढऱ्यांची मानसिकता आता बौद्ध समाजाच्या लक्षात आली आहे.
वास्तविक बौद्ध समाजाचे शिष्ट मंडळ जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना भेटून उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र कोणत्याही पक्षाचा प्रमुख पदाधिकारी अथवा फलटणमधील प्रमुख नेते मंडळी बौद्ध समाजाच्या उमेदवारीच्या मागणीचा आपल्या पक्षाकडे पाठपुरावा केल्याचे ठामपणे सांगत नाहीत. पक्षाने उमेदवार दिली तर आम्ही बौद्ध समाजाच्या बरोबर आहोत अशी बालिशपणाचे वाक्य बोलून बौद्ध समाजाची दिशाभूल करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र बौद्ध समाजाची मागणी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचे दिसत नाही. यावरून बौद्ध समाजाने योग्य तो बोध घेण्याची गरज असल्याचे जाणकार सांगतात.
बौद्ध समाजाच्या मतांवर स्थानिक राजकारण करणारे नेते मात्र बौद्ध समाजाच्या राजकीय हक्काच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत नाही हे मात्र नक्की. मात्र वेळ अजून गेली नाही अजूनही बऱ्याच घडामोडी घडणार आहेत त्यामुळे वेट अँड वॉच.... तूर्तास थांबू...